श्रीकांत उमरीकर

पुनश्च    मुकूल रणभोर    2019-12-22 06:00:34   

कालिदासाच्या स्मृतीत आषाढाचा पहिला दिवस 'आषाढस्य प्रथम दिवसे' साजरा केला जातो. कालिदासाच्या सर्वात लोकप्रिय 'मेघदूता'तील दुसर्‍या श्लोकातच हा आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. कालिदासाचे नाटक 'शाकुंतल' हे जास्त चर्चिले गेले. काव्यामध्ये मेघदूताखेरीज 'रघुवंश' व 'कुमारसंभव' ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाच्या एकूण उपलब्ध 7 रचनांपैकी ऋतुसंहार व विक्रमौर्वशीय या दोन काहीशा उपेक्षीत आहेत.   3 जूलै हा दिवस या वर्षी आषाढाचा पहिला दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने औरंगाबाद येथे धनंजय बोरकर यांचे कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.   धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या 'ऋतुसंहार'चा मराठीत भावानुवाद केला आहे. या भावानुवादाच्या दोन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.   बोरकर हे अभियंता असून भारतीय संरक्षण खात्यात त्यांची अधिकारी म्हणून काम केले आहे. एअर इंडिया मुंबई आणि सिंगापुर एअरलाईन्स येथेही त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर बोरकरांनी संस्कृतच्या ध्यासातून संस्कृत काव्याचा अभ्यास करायला सुरवात केली. जयदेवाच्या 'गीत गोविंद'चे त्यांचे भाषांतरही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.   सहा ऋतूंचे सहा सर्ग अशी मांडणी 'ऋतुसंहार' या खंडकाव्याची आहे. या काव्याची सुरवात वसंताने न होता ग्रीष्माने होते. कदाचित कालिदास मूळचा काश्मिरी असल्याने ग्रीष्मापासून सुरवात केल्याचा उल्लेख बोरकरांनी प्रस्तावनेत केला आहे. चार वेदांत अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात ग्रीष्माचा उल्लेख पहिला ऋतू म्हणून येतो. अथर्ववेदाच्या एका शाखेचा उगम काश्मिरात आहे. त्यामुळे कालिदासही अशी मांडणी करत असावा. यापेक्षा दुसरा एक तर्क पटण् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


काव्य रसास्वाद , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. ajitbmunj

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर.. हा लेख वाचून मूळ ऋतुसंहार व त्याचे बोरकरांनी केलेला भावानुवाद संपूर्ण वाचण्याची इच्छा ओरबाल होतेय..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen