पडद्याआडच्या प्रचारात भाजपची सरशी! - दै. प्रहार


निवडक अग्रलेख - १९ ऑगस्ट २०१९ मटा - मोदी सरकारने जनतेला पाजलेली विकासाची अफू उतरायला लागल्यामुळे आर्थिक संकट जाणवू लागले आहे. विशेषतः वाहन क्षेत्रातल्या चिंताजनक मंदीचा उहापोह आजच्या अग्रलेखात मटाने केला आहे. तालिबान- अल कायदा - आयसीस या दहशतवादी संघटनांची थोडक्यात जन्मकथा, त्यांचा आयएसआय आणि पाकिस्तानशी असलेला संबंध, या सर्वांमुळे झालेली अफगणिस्तानची दुर्दशा, आणि त्यांचा काश्मिरवर होवू शकणारा परिणाम असा विस्तृत आलेख लोकसत्ताचा अग्रलेख वाचकांसमोर आज मांडतोय. 'तृष्णेकाठची वेदना' या सकाळच्या अग्रलेखात महापूर आणि कोरडा दुष्काळ हे एकाच वेळी भोगाव्या लागणाऱ्या अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा- विदर्भ येथील शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. पण या समस्येवर नवीन पद्धतीचा तोडगा काढायला हवा असं सुचवणारा हा अग्रलेख, ती पद्धत कोणती याबद्दल काहीच सांगत नाही. 'उडाले ते कावळे, राहिले ते मावळे' ही मूळ शिवसेनेची घोषणा, हल्ली स्वतःच्या पक्षातील आउटगोइंग वर वापरणारे शरद पवार यांची खिल्ली उडवणारा सामना चा अग्रलेख धमाल आहे. आणि ... " २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीचं बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनवण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेचं होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रावादीच्या कावळ्यांनी तेव्हा ही फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. " हे वाक्य इतकं सूचक आहे की त्याचे असंख्य अर्थ निघू शकतात. राजकारणाचे पदर जाणणाऱ्या वाचकासाठी हे खाद्य आहे. 'बेपर्वाईचे बळी ' हा दिव्य मराठी

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , दैनिक प्रहार , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen