वाचकांची दिवाळी


आम्हा भारतीयांना सणांचे महत्व वेगळे सांगायला नको. अंधारलेल्या मनाला कायम तरतरीतपणा राहावा म्हणून योजिलेली ही मुळातली कल्पना. कालपरत्वे यात बदल होत गेले आणि बदल होत जातील कारण माणसाच्या मनाची ही भूक कायम राहणारी आहे. त्यात देखील दीपावलीचे महत्व आगळेवेगळेच. वर्षभर ज्याची सगळेच वाट पाहतात असा हा सण. दिवाळी म्हटली की गोडधोड, मेवामिठाई, नवे कपडेलत्ते, रोषणाई असा मोठा जल्लोष असतो. या मध्ये वाचकांच्या लेखी आणखी एक गोष्ट असते, ज्याच्याशिवाय ही दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे दिवाळी अंक! किंबहुना असं ही म्हणता येईल की दिवाळीच्या निमित्ताने वाचनानंद देणारी कल्पना सर्वप्रथम मराठीमध्येच आली. विविध प्रकारचे अंक : वाचक कुठल्याही प्रकारचा असो त्या सर्वांसाठी दिवाळी अंक आहेत. कथा, कादंबरी, विनोद, भविष्य, पाककला, मनोरंजन, गुढकथा, रहस्यकथा, लहान मुलांसाठी सुद्धा बाल विशेषांक असे नाना प्रकार सांगता येतील. मौज, दीपावली, दिपलक्ष्मी, धनंजय, चंद्रकांत, हंस, नवल, मोहिनी, ललित, साहित्यसूची, पद्मगंधा असे हे काही अंक आता प्रस्थापित आहेत. जणू ही नाव ब्रॅन्डनेमच. असे जवळजवळ ३०० ते ४०० दिवाळी अंक निघतात. त्यात दरवर्षी भरच पडत असते. दिवाळी अंकाचा प्रारंभ  : मग दिवाळी अंक हि प्रथा केव्हा पासून चालू झाली? याचे श्रेय काशिनाथ रघुनाथ मित्र   यांच्याकडे जाते. त्यांनी त्यांच्या मासिक मनोरंजनाचा हा  दिवाळी अंक सर्वप्रथम १९०९ च्या दिवाळीत सुरू केला.  इथे हे ही सांगायला पाहिजे त्या अगोदरदेखील १० ते १२ वर्ष  मासिक मनोरंजन नियमितपणे प्रकाशित होत होते. वाचकांना आकर्षित करण्याकरिता त्यांनी विविध उपक्रम केले. त्या पैकीच त्यांचा एक उपक्रम म्हण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , प्रासंगिक , भाषा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. विकास पोवार

      7 वर्षांपूर्वी

    खुपच छान कल्पना खुपच छान साहित्य



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen