‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे’


विठ्ठलराव विखे पाटलांनी इ.स.१९४९ साली अहमदनगर जिल्हयातील प्रवरा नगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. नंतर  पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचं मोठं जाळंच उभं राहिलं. बघता बघता हे सहकारी साखर कारखाने आर्थिक व राजकीय सत्तेची केंद्र झाली. यातूनच ‘साखर सम्राट’ हा शब्द वापरात आला. पश्चिम महाराष्ट्रात जसे ‘साखर सम्राट’ तसेच गुजराथेत ‘तेल सम्राट’ तर विदर्भात ‘कापूस सम्राट’ निर्माण झाले.  त्या त्या भागातील पारंपरिक पिकाभोवती सहकारी चळवळ उभी राहिली. या सहकारी कारखान्यांमुळे त्या त्या भागाचा आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला. मात्र बघता बघता या सहकारी चळवळीत अपप्रवृत्ती शिरल्या व मग सुरू झाला पैशाचा व आर्थिक राजकीय सत्तेचा माज आणि नंगा नाच. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवत ‘सामना’या चित्रपटाला सामोरं जावं लागतं.

                          ‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे’

  -प्रा. अविनाश कोल्हे मराठी रंगभूमीवर जसं विजय तेंडुलकरांचं योगदान लक्षणीय आहे तसंच काही प्रमाणात मराठी चित्रपटसृष्टीवरही आहे. त्यांची पटकथा व संवाद असलेला ‘सामना’ हा १९७५ साली आलेला चित्रपट आजही चर्चेत असतो. हा कृष्णधवल चित्रपट खऱ्या अर्थाने राजकीय चित्रपट आहे तर ‘सिंहासन’हा चित्रपट राजकीय क्षेत्रातील भीषण सत्तास्पर्धेबद्दल आहे. मराठी नाटकांत आजही जसं गों पु. देशपांडे यांचं ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक खऱ्या अर्थाने राजकीय नाटक आहे त्याच अर्थाने डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘सामना’हा खरा राजकीय चित्रपट आहे. ‘सामना’ जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो चारपाच वेळा तरी  बघितला होता. आता हा लेख लि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    चांगला लेख. पण अपूर्ण वाटला. लेखाला सुरुवात झाली म्हणतानाच मध्येच लेख संपला. असो. तरीसुद्धा लेख आवडला. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

  2. shripad

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen