शतकापूर्वींचे हैद्राबाद


इ. स. १८०० मध्ये इंग्रजांनी हैद्राबादच्या निजामाबरोबर तैनाती फौजेचा तह करून त्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. त्यावेळी हैद्राबादच्या गादीवर निजाम अलीखान हा असून मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध असलेला मुशीरुल्मुल्क हा दिवाण होता. केवळ मराठ्यांच्या भीतीमुळे मुशीरुल्मल्काने इंग्रजांबरोबर तह घडवून आणला. या तहाप्रमाणे इंग्रजांनी हैद्राबादचे परचक्रापासून रक्षण करण्याची जबाबदारी पत्करली. इंग्रजांची तैनाती फौज सिकंदराबाद येथे राहू लागली. या फौजेच्या खर्चाकरिता निजामाने, म्हैसूरच्या युद्धात त्याच्या वाट्यास आलेले कदपा, कर्नूल, अनंतपुर, बल्लारी हे जिल्हे इंग्रजांना लावून दिले. या तहांतील कलमाप्रमाणे युद्धप्रसंगी निजामाने पण सहा हजार पायदळ आणि नऊ हजार घोडेस्वारांसहित इंग्रजांना मदत करावी असे ठरले होते. पण इंग्रज मराठा युद्धात निजामाच्या सैन्याची शोचनीय स्थिती दिसून आल्यामुळे इंग्रजांनी मागणी केली, की निजामाच्या सैन्यात सुधारणा झाली पाहिजे. नाही तर त्याची मदत असून नसल्यासारखी आहे. हे पाहून निजामाने आपल्या सैन्यात काही इंग्रज अधिकारी नेमून कवायती सैन्य तयार करण्याचा प्रयत्न केला. या सुमारास निजामअलीचा मुलगा सिकंदरजाह (इ. स. १८०३-१८२९) हा गादीवर होता. निजामअलीखानाचा दिवाण मुशीरुल्मुल्क याचा मृत्यू इ. स. १८०४ मध्ये झाल्यावर, इंग्रजांशी स्नेहभाव ठेवून वागणारा मीर आलम हा दिवाण झाला. (इ. स. १८०४ ते १८०८) [caption id="attachment_9766" align="alignright" width="201"] मीर आलम[/caption] इंग्रज मराठा युद्धानंतर भोसल्यांनी वऱ्हाडवरील आपले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


स्थललेख , आलमगीर , दीर्घा , सेतूमाधवराव पगडी

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen