संपादकीय - अपशब्द, निषिद्ध शब्द आणि समाज


‘अलिबागहून आलास काय?’ (अलिबाग से आया है क्या?) ह्या वाक्यावर म्हणजेच त्यातील ‘तू मूर्ख आहेस काय?’ ह्या अर्थाच्या वाक्प्रचारावर बंदी आणण्यासाठी एक याचिका अलिबागच्या एका रहिवाशाने न्यायालयात दाखल केली होती. वैभवशाली परंपरा असलेल्या अलिबाग शहराचा म्हणजेच तेथील लोकांचा अवमान करणारा हा वाक्प्रचार असल्याचा त्याचा दावा होता. न्यायालायाने ही याचिका फोटाळून लावताना असे विनोद सर्व समुदायांवर होतच असतात, ते फारसे मनाला लावून घ्यायचे नसतात असे संगितले. समाजाच्या भाषिक वर्तनाबाबतच्या अशा याचिकेवर कोणतेही न्यायालय ह्यापेक्षा वेगळे काय सांगणार? समाजाचे तोंड कोण बंद करणार? असे दावे न्यायालयांना नवीन नाहीत. संता आणि बंता ही सरदारजींची काल्पनिक पात्रे घेऊन केल्या जाणाऱ्या विनोदांवर बंदी आणावी म्हणून शीख समाजातील एका समूहाने न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने अशीच भूमिका घेतली होती. पुणेकरांच्या नावाने काय आपण थोडे विनोद खपवतो? हा मनुष्यस्वभाव आहे आणि भाषा त्याला अवकाश पुरवते. दोष असलाच तर तो भाषेचा नसून समाजाच्या मानसिकतेचा आहे... (पुढे वाचा)


भाषा ही संप्रेषणाच्या, सर्जनाच्या शक्यता पुरवणारी चिन्हव्यवस्था आहे. ह्या शक्यतांचा वापर कसा करायचा किंवा करायचा की नाही करायचा हे सर्वस्वी व्यक्तीवर आणि पर्यायाने समाजावर अवलंबून असते. भाषा  वापरली तर वाढते नाही वापरली तर संपते. समाजाच्या इच्छेवरच तिचे बरेवाईट अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे भाषा मानवाला सामर्थ्य प्रदान करीत असली तरी स्वतः मात्र समाजावलंबी म्हणजे पराधीन आहे.

भाषेचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , भाषा , मराठी प्रथम - संपादकीय

प्रतिक्रिया

  1. arvindjadhav

      5 वर्षांपूर्वी

    नित्याचे भाषाध्ययनास उपयुक्त ठरावे असे सरांचे लेखन ...उत्तमच!

  2. aratigawade

      5 वर्षांपूर्वी

    भाषा अभिव्यक्तीचे साधन आहे.शब्द चांगले किंवा वाईट नसून ते व्यक्ती किंवा समाज्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते.हे खूप छान प्रकारे परब सरांंनी पटवून दिले. धन्यवाद!वाचनीय लेख! छान !

  3. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen