पहिले ते मराठीकारण - धन्यवाद आदित्य ठाकरे!


शिवसेनेला कार्यकर्ते पुरवणारा समाज मराठी आहे, पण पैसे पुरवणारे मात्र वेगळ्या समाजातले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये न शिकल्याने मराठी माध्यमांचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषेचा मराठी माणसांशी काय संबंध आहे याची आदित्य ठाकरे या तरुण राजकारण्याला कल्पना असण्याचे कारण नाही. बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात उद्धवची आणि आदित्यची काळजी घ्या, असे शिवसैनिकांना आर्जवाने सांगितले, त्यांनीही ते मनावर घेऊन शिवसेना कोसळू दिली नाही. एवढेच नव्हे तर आदित्याच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला तरुण संसदीय राजकारणात उतरला यापेक्षा अधिक मराठी समाजाने शिवसेनेसाठी काय करायला पाहिजे? मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार?

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२५ जुलै १९५९ या दिवशी दैनिक 'मराठा’च्या अंकात आचार्य प्र. के. अत्रे यांनी तरुणांना आवाहन करताना 'शिवसेना उभारा' असे म्हटले होते.  जानेवारी १९६३ मध्ये दैनिक 'मराठा’मधून अत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेना या संघटनेबद्दल विचार मांडले होते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी. या दोघांच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , भाषा

प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    मराठीयांचे गोमटे होण्याचा मार्ग मोकळा होईल. वरची आशा ही मुंबईसाठी तरी भ्रामक आहे. आणि महाराष्ट्राचे लोकसंख्येच्या स्तरावरील अमराठीकरण असेच चालु राहीले तर येत्या काही दशकात पुणे, नाशिक, नागपूर इ. आर्थिक, सामाजिक शक्तीकेंद्रे सुद्धा मुंबईप्रमाणेच होतील. भारतीय संघराज्याच्या परिप्रेक्षात फक्त लोकसंख्याच भविष्य निर्धारित करणार आहे. प्रत्येकाला त्याची मातृभाषा प्रिय असते त्यामुळे मुंबईतील अर्थकारण, राजकारण, समाजकारण आता भविष्यात फक्त मराठी विरुद्ध अमराठी असेच राहणार आणि कदाचित महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरातील सुद्धा. आदित्य ठाकरेंना मराठी विषयक किती ममत्व आहे हा प्रश्न येथे महत्त्वाचा नाही. राजकारणात जिंकणे व सत्ता संपादन करणे यालाच अंततोगत्वा महत्त्व आहे. स्व. बाळासाहेबांना निवडणुक लढवायची नव्हती त्यामुळे त्यांच्यापुढे हे प्रश्न नव्हते. आदित्य ठाकरेंचे ध्येय मुख्यमंत्री होणे हे आहे मग ३० टक्के अमराठी मते त्यांच्यासाठी ७० टक्के मतांएवढीच महत्त्वाची आहेत. तमिळनाडुसारख्या राज्यातसुद्धा कट्टर तमिळ छवि असुनही करुणानिधींना पराभव स्विकारावा लागला मग आदित्य ठाकरेंची काय कथा. मराठी बाणा सोडुन हिंदुत्व स्विकाररेल्या शिवसेनेची ही फरफट आता थांबणार नाही कारण मराठी भाषिकांनी सुद्धा हिंदुत्व स्विकारले आहे. महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारण किंबहुना सर्व भाषिक राज्यातील राजकारण आता हिंदुत्व विरुद्ध भाषिकत्व असेच राहणार त्यामुळे या दोनही गोष्टींची जो नेता सावधपणे सांगड घालेल तो जिंकेल. त्यामुळे भाषा जपायची असेल भाषिक कट्टरपणा फार महत्त्वाचा कारण भाषा संपली की अस्मिता/ओळख संपली. पहिले ते मराठीकारण करायचे असेल तर मुंबई व महाराष्ट्रातील अमराठी टक्का कमी करणे व मराठी भाषाधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. झपाट्याने वाढणारी अमराठी लोकसंख्या हे स्थलांतर नव्हे तर सांस्कृतिक टोळधाड आहे. ती थांबविली नाही तर मराठी भाषाच नामशेष ( भेसळ भाषा ही नामशेष मानावी ) होईल कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते.

  2. अरुण दत्तू बांदेकर

      5 वर्षांपूर्वी

    काय बोलणार?काय लिहिणार आणि कसली प्रतिक्रिया देणार?इथे विचारतोय कोण कुणाला? ----अरुण दत्तू बांदेकर अ

  3. अरुण दत्तू बांदेकर

      5 वर्षांपूर्वी

    एक होता वाघ,ढाण्या वाघ महाराष्ट्राचा वाघाचा नंतर झाला वाघोबा,बछडेही झाले थंडोबा हळुहळु वाघ थकला,शेळी बनून पाला खात बसला पाला खाताना,म्याँव म्याँव सतत करू लागला वाघाला कळून चुकले,ताकद आता संपली मांजर होऊन आता,बसावे कुणाच्या ताटाखाली ढाण्या वाघ तो महाराष्ट्राचा,आज दीनवाणा बापुडा 'आरे'तील त्या वृक्षांसंगे,झेलतोय घाव कोयत्यांचा । --अरुण दत्तू बांदेकर

  4. सुबोध केंभावी

      5 वर्षांपूर्वी

    तेंडुलकरांनी अत्र्यांवर लिहिलेल्या लेखाचे शीर्षक ‘ प्रचंड ’ असे आहे. हा लेख ज्या पुस्तकात आहे त्याचे नाव ‘ हे सर्व कोठून येते’ असे आहे. मुख्यमंत्र्यांपासून मांजरापर्यंत सर्वांच्या मनाचा वेध घेणारे, तेंडुलकरांच्या खास शैलीतले लेख ह्या पुस्तकात आहेत.

  5. सुबोध केंभावी

      5 वर्षांपूर्वी

    >राजकीय पक्षांना निवडणुकांच्या आगेमागे प्रचंड देणग्या कोण देतो? महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत टेबलांमागे बसून काम करणारा कारकून ते सनदी अधिकारी हे बहुतांश मराठी असले तरी ते कोणाचे हितसंबंध जपतात? < जागतिक भांडवलशाहीबरोबर निगडित असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे हितसंबंध जपतात. राजकीय पक्षांना देणग्या मिळणे अशा अर्थव्यवस्थेमुळे शक्य होते. बहुतेक मराठी माणसे जागतिक भांडवलशाही आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या संबंधाबाबत अज्ञानी आहेत आणि उद्योजकतेबाबतही बेफिकीर किंवा असंघटित आहेत.

  6. संजय रत्नपारखी

      5 वर्षांपूर्वी

    डॉ. दिपक पवार यांनी हा लेख सविस्तरपणे लिहून सेनेची वाढ सध्याचे वास्तव याची सांगड घातली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे सुरू असताना मराठी अस्मिता शिगेला पोहोचली होती. आचार्य प्र.के.अत्रे यांना मराठी माणसाचा विकासाचे आत्मभान होते. मुंबईसह महाराष्ट्र जरी मिळाला तरी पुढे नोकऱ्या, विकास यासाठी संघर्ष करावा लागेल, याची त्यांना जाणीव होती. यातून मराठी माणसाचे हक्क शाबूत राहावेत, यासाठी लढाऊ संघटनेची गरज त्यांना वाटली. शिवसेना ही संकल्पना त्यांचीच. शिवसेना स्थापन केली बाळासाहेब ठाकरे यांनी याचे कारण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर समिती विसर्जित होत गेली. प्रथम समाजवादी आणि नंतर शेकाप नेते यातून बाजूला होत गेले. समिती हाच एखादा प्रादेशिक पक्ष झाला असता तर हे चित्र वेगळे राहिले असते. मराठी माणसाच्या पाठिंब्यावर शिवसेना मोठी झाली. परंतु तिला आर्थिकबळ हे अमराठी लोकांकडून मिळत गेले. याची जाण म्हणून सेनेने बरेच अमराठी लोकांना राज्यसभेत पाठविले. आता आदित्य नेतृत्व करणार ती सेना जागतिककरण, खाऊजा धोरण काळातील आहे. त्यामुळे ते देखील नवी कसरत सांभाळूनच नेतृत्व देतील. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिकपक्षांचे खूप प्रयोग झाले. शेकाप, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना तरी हे पक्ष एका मर्यादे पलिकडे वाढले नाहीत, हा इतिहास आणि आजचे वर्तमान आहे. डॉ. संजय रत्नपारखी.

  7. vinayakbapat

      5 वर्षांपूर्वी

    लेख आवडला, आपण सर्वानी एकत्रितपणे पणे मराठीचा झेंडा उंचावर लावायला हवा , ति प्रत्येकाची जबाबदारी आहे .कोणत्याही पक्षाकडे अपक्षेने पहाण्यात अर्थ नाही.

  8. नीलांबरी कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    फार रास्त भूमिका! नेमके विश्लेषण!

  9. संजय रत्नपारखी

      5 वर्षांपूर्वी

    दिपक पवार यांनी समकालीन संदर्भ देत शिवसेनेची वाटचाल कशी झाली, याचा आढावा मांडला आहे. ' शिवसेना'ही कल्पना आचार्य अत्रे यांची होती. परंतु ती त्यांना राबविता आली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जरी झाला तरी नोकरी, व्यवसाय यासाठी संघर्ष करावा लागेल, याची अत्रे यांना जाणीव होती. संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र समिती १९६० नंतर विसर्जित होत गेली. प्रथम समाजवादी आणि नंतर शे.का.प. बाहेर आला. समितीचे राजकीय पक्षात रूपांतर झाले नाही आणि नंतरच्या संघर्षात ती आली नाही. ही पोकळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याला मिळालेले राजकीय यश म्हणजे आजची शिवसेना आहे. राजकीय पक्षांना पैसा आणि माणसे लागतात. यात मराठी समाजातून माणसे मिळाली. पैसे हे अमराठी लोकांकडून मिळत गेले. त्यामुळे बहुभाषिक राजकीय कसरत सेना करत आली. कैक अमराठी लोक हे सेनेतून खासदार झाले. आता नव्या पिढीचे आदित्य ठाकरे याची व्याप्ती वाढवतील. डॉ. संजय रत्नपारखी, मुंबई.

  10. बाबासाहेब जगताप

      5 वर्षांपूर्वी

    नेमके विश्लेषण.. मराठी माणसाने (निदान मुंबईतल्या तरी) मराठी माणसाचे, मराठीषेचे भले करणारा एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेकडे आशेने पहात रहाणे हे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे.

  11. mbdeshmukh

      5 वर्षांपूर्वी

    लेख अत्यंत स्पष्ट आणि मुद्देसूद आहे. मराठीची अशी सार्वजनिक अवहेलनाच आता कदाचित मराठी माणसाच्या अस्मितेच्या जाणिवेवर आलेली मरगळ दूर करायला मदत करेल. ढुंगाणाखाली आग लागल्याशिवाय जागं न होण्याची सवय आहे मराठी माणसाला. थोडी अजून झळ बसायला सुरुवात झाली कि आज जे या मुद्दयांवर उघडपणे मत द्यायला शुद्ध कमीपणा मानतात ते सुद्धा बोलायला लागतील.

  12. विजय घुमरे

      5 वर्षांपूर्वी

    आदित्य ठाकरे,पार्थ पवार,रोहीत पवार या सारख्या तरूणांचे अगदि कमी वयांत करोडोची संपत्ती मिळविण्याचे त्यांचे व्यवसाय तरी कोणते आहेत हा प्रश्न मराठी तरुणांना पडला आहे. एवढ्या प्रचंड संपत्ती बाबतचा सोअर्स आॅफ इन्कम काय आहे याची चौकशी करणे ना शासकीय यंत्रणाना आवश्यक वाटत,ना ED ला ना न्यायालयांना. पत्रकार प्रसिध्दी माध्यमेही याविषयी बोलत नाहीत. आपल्या सारखे विचारवंतही बोलणार नसतील तर मग कोणाकडुन अपेक्षा ठेवायची?

  13. Manisha shelar

      5 वर्षांपूर्वी

    Thanks



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen