पहिले ते मराठीकारण - महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होणार?


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला काही वेळा उपरोधाने सोनिया काँग्रेस म्हणण्याची पद्धत आहे. या पक्षाबद्दल आज मी बोलणार आहे. गेल काही वर्षे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि संघ परिवाराचे लोक हा देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे, अशा पद्धतीची विधानं करताना आपल्याला दिसतात. ज्या पद्धतीचं यश किंवा यशाचा अभाव काँग्रेस पक्षाच्या बाबतीत २०१४ मध्ये आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसला, तो पाहता भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांना काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या प्रक्रियेत यश येतंय की काय अशा प्रकारची शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते. पण माझ्यासमोरचा आजचा खरा प्रश्न तो नाहीय, माझ्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की, काँग्रेसमुक्त भारतासाठी किंबहुना आता महाराष्ट्रपुरतं बोलायचं तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेस स्वतःच प्रयत्न करतोय की काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. हे विधान मी का करतो? तर २०१९ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, तिच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा चालू आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पातळीवरील अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. याबद्दल आपल्याला तक्रार करता येऊ शकते की, या माणसांनी महाराष्ट्रामध्ये येऊन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतं का मागावीत? पण आज त्या पक्षाकडे सत्ता आहे, त्या पक्षाकडे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये माणसं आहेत आणि त्यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर लढू द्यायची नाही. कारण महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर ही निवडणूक तुम्ही लढायला घेतलीत की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीचे नेमके वर्णन या लेखात केले आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen