'चला हवा येऊ द्या' पत्र फेम अरविंद जगताप म्हणतात की...


"...कॅमेरामनला तो सीन घेऊन शूट करायचा असतो. मेकपमनला  चेहरा घेऊन रंगवायचा असतो. एडिटरला  फिल्म एडिट करायची असते. संगीतकाराला देखील सीन आणि वातावरण बघून त्या शब्दांना चाल लावायची असते. लेखकाकडे असं काहीच नसतं. त्याला ते सगळं नवीन तयार करायचं असतं. तो त्याच्या मनाचा खेळ असतो. त्याला ते त्यातून निर्माण करायचं असतं. त्याच्या मनातून ते सगळं येणार असतं. ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे, पण लोक तिला खूप सहज समजतात. तुमच्याकडे काही नसताना तुम्हाला काही तरी निर्माण करून दोन तास लोकांना खिळवून ठेवणारी एक गोष्ट बनवायची असते. त्यामुळे हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास आणि अनुभव महत्त्वाचा आहे..."

लेखक, पटकथाकार अरविंद जगताप या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना भाषेच्या कोणत्या  कौशल्याबाबत सांगतायत? बीएमएमचा विद्यार्थी रोहन गपाट याने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये वाचा -   

------------------------------------------------------------------

प्र. उत्तम कथा व कसदार लेखन म्हणजे काय?

उत्तम कथा ही मराठी चित्रपटांची मुख्य ओळख आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठी चित्रपटांसाठी लिखाण केलंय. राजन खान, आनंद यादव अशा कसदार लेखकांच्या कथांवर सिनेमे निघालेत. या कथा नवीन लेखकांना चित्रपट कथा कशी असावी हे समजण्यासाठ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा

प्रतिक्रिया

  1. SubhashNaik

      5 वर्षांपूर्वी

    कसदार लिखाणासाठी वाचन हा सगळ्यात मोठा रियाज! उत्तम मुलाखत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen