नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग दोन)


मुलांची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून आचार्य अत्रे यांनी पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १९३०च्या दशकात नवयुग वाचनमाला सुरू केली. अत्रे यांच्या बालसाहित्याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतील डॉ. वीणा सानेकर यांचा हा दुसरा  लेख.

-----------------------------------------------------------------------------

नवयुग वाचनमालेची आठवण झाली आणि अनपेक्षितपणे घरातल्या पुस्तकांमधली आचार्य अत्रे यांची आणखी दोन पुस्तके आठवली. कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले ही ती दोन पुस्तके. ‘कऱ्हेचे पाणी’ या अत्रे यांच्या आत्मकथनातील दुसऱ्या खंडात त्यांनी मुलांसाठी रचलेल्या गोष्टी नि पाठांमागची भूमिका स्पष्ट केली आहे. ती पुढीलप्रमाणे - "मुलांना भावी आायुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. आधुनिक वाङ्‍मयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्यांचा मोठ्या कौशल्याने मी या गोष्टींतून उपयोग करून घेतला आहे. लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा मी सर्रास उपयोग करून घेतला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी सापडते, तशी भाषा  मुलांना वाचायला लावणे हे मानसशास्त्राच्या विरुद्ध आहे."

हेही वाचाः-

नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग एक)

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. chanibhamare

      4 वर्षांपूर्वी

    मराठी भाषेतील रंजकता व महत्त्व सागणारा छान लेख

  2. rajushinde

      4 वर्षांपूर्वी

    दोनही लेख छान ! खरं तर मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टीतून भाषेकडे नेंण्याचे, भाषेची गोडी निर्माण करण्याचे नवयुग वाचनमाला हे माध्यम आहे, इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी अशा उदबोधनपर लहान गोष्टी, कविता यांची आवश्यकता आहे (वाचू आनंदे, पंचतंत्र, पारंपरिक लोककथा, बिरबल कथा,तेनाली राम, सिंहासन बत्तीशी, लघुकथा, बालकविता इत्यादी)

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम. मराठी भाषा समृद्ध आहेच. आणि या ,👆गोष्टी तर फारच छान आहेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen