शालेय शिक्षण - टाळेबंदीतील आणि नंतरचे


कोविड- १९ ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलाय. नैसर्गिक आपत्तीपेक्षाही दूरगामी परिणाम या आजारामुळे होणार आहेत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी प्रथम तीन आठवड्यांसाठी टाळेबंदी जाहीर केली आणि त्याची मुदत वेळोवेळी वाढवत नेली. त्यामुळे वार्षिक निकाल न लागताच शाळा एकाएकी बंद झाल्या. त्या परत कधी सुरू होतील, हे आज कोणीही सांगू शकत नाही. राज्यातल्या विविध भागांमध्ये कोविड-१९ जसजसा नियंत्रणात येत जाईल, तसतशी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवली जाईल, अशी शक्यता दिसते. त्यात शारीरिक अंतराचा विचार केला तर इतर आस्थापनांच्या तुलनेत सिनेमा, नाट्यगृहे, शाळा व महाविद्यालये सर्वात शेवटी सुरू होतील. मुंबई, पुणे व इतर काही क्षेत्रांमध्ये आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्यामुळे तिथली टाळेबंदी बऱ्याच उशिराने उठेल. तसेच, टाळेबंदी उठल्यानंतर नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे आजाराचा फैलाव पुन्हा वाढून सरकारला काही भागात पुन्हा टाळेबंदी सुरू करावी लागू शकते. तसेच काही महिन्यांत आजार नियंत्रणात आला तरी पुढील दोन वर्षात तो अधूनमधून डोके वर काढत राहील, असे मत जाणकार मांडत आहेत. कोविड १९च्या संदर्भात नियोजन करताना या सर्व शक्यता लक्षात घ्याव्या लागतील.

या आजारावर मात करणे, जीवितहानी टाळणे आणि अन्नधान्याचा पुरवठा करून उपासमारी टाळणे महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहे, हे निश्चित. परंतु या आजाराचे विविध क्षेत्रांवर होणारे संभाव्य परिणाम ओळखून वेळीच त्यावर उपाययोजना करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी निश्चित असे हेतू ठरवून टाळेबंदीच्या कालावधीसाठी तातडीचा आणि त्यानंतरच्या काळासाठी दीर्घ मुदतीचा आरा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      4 वर्षांपूर्वी

    गोविंद, करोनाच्या पार्श्वभूमीवरील सीमाभागातील घडामोडी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

  2. pgovind

      4 वर्षांपूर्वी

    यातल्या काही महत्वाच्या बाबींवर आज कर्नाटक सरकारचच शिक्षण विभाग विचाराधीन आहे.

  3. pmadhav

      4 वर्षांपूर्वी

    शालेय शिक्षणाच्या सर्व अंगांचा विचार करुन सरांनी उत्तम मांडणी केली आहे... शिक्षण, आरोग्य या मुलभुत व्यवस्थांच्या व्यापारीकरणाचे तोटे या परीस्थितीत आपल्याला स्पष्टपणे समजायला हवेत... यापुढे ते टाळायला हवेत... सर्वांना उत्तम गुणवत्तेची शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी व्यापक आराखडा बनविण्याची गरज आहे... विचार कसा करावा? याचे शिक्षण शालेय स्तरापासुन खरंच खुप आवश्यक आहे... मानवाच्या विकासामधल्या सर्वात मुख्य घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे... माधव पंडित

  4.   4 वर्षांपूर्वी

    चहु अंगांनी विचार करणारा अभ्यासपूर्ण लेख.जीवन मरणाचा प्रश्न,कौशल्या धिष्टीत शिक्षण, संकटाला संधी मानून फायदा घेणे सामाजिक स्तर सुधारणे.दूरदृष्टीने आयोजन,शारिरीक व मानसिक अवस्थेचा विचार,हे मुद्दे महत्वाचे आहेत.समजातील उथळवृत्तीकडे लक्ष वेधणे परिणामकारक वाटले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen