आपण तेच, आपले प्रश्न, मानसिकताही तीच!

पुनश्च    संकलन    2019-05-22 06:00:27   

बदल हाच नियम आहे, असे आपण भले म्हणत राहू, प्नत्यक्षात, अनेक बाबतीत वर्षानुवर्षे बदल न होणे हाच आपल्याकडे खरा नियम आहे. गेले दोन महिने आपण देशापुढील प्रश्नांबाबत ऐकतो आहोत, त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे, असं दिसतं. जून १९५३ साली प्रसिद्ध झालेल्या या प्रस्तुत लेखात लेखक म्हणतो, 'आपल्या महाराष्ट्रांत  दुष्काळ, रोगराई, बेकारी अशी तीन दुःखे आहेत.' मराठी माणूस नोकरीच्या नाहक मागे लागतो, व्यवसायाकडे जात नाही, अशी तक्रार आपण आजही करतोच, प्रस्तुत लेखक म्हणतो, 'शाळामास्तर होऊन किंवा सरकारी नोकऱ्या करून संपत्ती मिळणार नाही. ती मिळविण्यासाठी आपण व्यापारी बनले पाहिजे.' म्हणजे गेली अनेक वर्षे, आपण तेच, आपले प्रश्न-आपली मानसिकताही तीच! बेकारी-निवारणाची एक दिशा (मूळ शीर्षक) अंक – एकता, जून १९५३ आपल्या भारताला स्वराज्यप्राप्ती १५-८-१९४७ या दिवशी झाली. त्याचे आधी ज्या स्वराज्याची व त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाची आपण चातकाप्रमाणे वाट पाहात होतो, ज्याच्या प्राप्तीसाठी आपण हाल भोगले, अपमान सोसले व स्वार्थत्याग केला ते सौख्य आपणाला स्वराज्यप्राप्तीनंतर मिळावयास हवे पण ते न मिळता उलट नाना यातना प्राप्त झाल्यामुळे सारखे झगडावेच लागत आहे. याचे कारण काय? कोणत्या मार्गाने गेले असता आपणांस सौख्यलाभ होईल? हा नवा प्रश्र्न सांप्रत आपल्यापुढे उभा राहिला आहे व तो सोडविल्यावाचून गत्यंतर नाही असे झाले आहे. भारतांत दुष्काळ व रोगराई अशी दोन दुःखे पण आपल्या महाराष्ट्रांत मात्र दुष्काळ, रोगराई, बेकारी अशी तीन दुःखे आहेत. कारण व्यापारी होण्यावर किंवा वणिग्वृत्ती, वाणिज्यवृत्तीवर महाराष्ट्राइतका बहिष्कार कोणत्याच प्रांताने घातला नसेल. दु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , पुनश्च , एकता

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    66 वर्षांपूर्वीचा लेख असला तरी तपशिलात फक्त फरक आहे मूळ व्याधीत काही फरक पडलेला नाही .

  2. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    व्यापर करण्याचा आळस , भिती हे पूर्वी पासून मराठी माणसाच्या मनात रुजले आहे . पण काळाची गरज बघता व्यापर करण्याशिवाय मराठी माणसाला आज दुसरा पर्याय नाही . 1953 मांडलेला विषय आज चा च वाटतो आहे .

  3. deepa_ajay

      5 वर्षांपूर्वी

    एकूण मराठी माणसांची मानसिकता ही "व्यापार" करण्यास फारशी योग्य नाही, व्यापार हा फार अस्थिर असतो, खुप मोठी जोखीम घ्यायची तयारी नसते,



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen