अश्रू झाला आहे खोल...


अंक : सत्यकथा, ऑगस्ट, १९७६ लेखाबद्दल थोडेसे : काही माणसे अशी असतात, ज्यांच्याबद्दल चार शब्दही लिहिताना बोटे अडखळतात, त्यांच्या मोठेपणाला आपल्या एखाद्या अजागळ शब्दानं उणेपणा येऊ नये म्हणून! काही लेख असे असतात, ज्या लेखाबद्दल काहीही सांगितले तरी त्यात त्या लेखाच्या भावार्थाचा छोटासा अंशही येणं अवघड असतं. तो लेख स्वतः वाचणं, स्वतः अनुभवणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो, तसा हा लेख आहे. आरती प्रभूंच्या मृत्यूनंतर संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकरांनी वाहिलेली ही शब्दांजली आहे.  आरती प्रभू उर्फ चिं त्र्यं. खानोलकर यांची ९० वी जयंती मार्चमध्ये झाली तर त्यांना जाऊन एप्रिलमध्ये  ४४ वर्ष झाली. हे निमित्त साधून खानोलकरांच्या कवितांचा, त्यांच्या साहित्यातील उतारे सादर करण्याचा एक कार्यक्रम 'पुनश्च'ने सदस्यांसाठी योजला होता,परंतु 'करोना'ने पुन्हा एकदा 'गेले द्यायचे राहून,तुझे नक्षत्रांचे देणे' असे म्हणायची वेळ आणली. दुर्दैव आरती प्रभूंचा पिछा सोडायला तयार नाही. या महान शापित कलावंताची कलंदर वृत्ती सांगणारा हा लेख तूर्तास वाचा, संधी मिळाली तर कार्यक्रम निश्चितच करु...

********

आरती! माझ्या स्वरांना पोरकं करून गेलास ना? तुझ्या शब्दांनी माझ्या स्वरांना नव्हाळी दिली, तुझ्या प्रतिभेच्या भरारीत माझे सूर काही क्षण भिरभिरत राहिले. विसर्जित होत गेले. माझ्या स्वरांचं व्यक्तित्व तुझ्या अभिव्यक्तीत आणि तुझ्या शब्दामुळे माझ्या सुरांना मिळालेलं यश, तू मला दान करून निघून गेलास. अरे! हे नक्षत्रांचे देणं तू मला देऊन गेलास. माझ्या ओठावर तुझ्या त्या ओळी हुळहुळतात : “गेले द्यायचे राहून”, खरंच, फार फार राहून गेलं. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सत्यकथा , व्यक्ती विशेष , मृत्यूलेख
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    दोन अद्वितीय कलावंत, संवाद सुध्दा तितकाच संवेदनशील व सुरेल

  2. Chandrakant Chandratre

      3 वर्षांपूर्वी

    भाऊक कवी आणि तितकेच भावपुर्ण व्यक्तिचीत्रण. स्वर लयीत येतात असे नाही, संगीतकाराचे शब्दही सुर पकडून येतात.

  3. Prathamesh Kale

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख

  4. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान. दोन प्रतिभावंतांच्या कलात्मक देवघेवीबद्दल असं क्वचितच वाचायला मिळतं. धन्यवाद.

  5. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    आरती प्रभुविषयी लिहितांना हृदयनाथजिंनी वेगळाच बाज स्वीकारलाय. मुक्त काव्य, आणि आतड्याची ओढ!

  6. Madhavi Gharpure

      3 वर्षांपूर्वी

    आरती ते आरती च आणि हृदय नाथ ते हदयनाथच.

  7. Suhas Joshi

      3 वर्षांपूर्वी

    खुपच छान, मनापासून लिहिलं आहे.

  8. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान. दोघेही साध्या शब्दातून व्यक्त होत राहतात.

  9. सुधन्वा कुलकर्णी

      3 वर्षांपूर्वी

    तांत्रिक कारणांमुळे हा लेख अर्धवट दिसत होता. आता लेख अपडेट केला आहे. सभासदांना झालेल्या तसदीबद्दल पुनश्चतर्फे क्षमस्व!

  10. pramod kale

      3 वर्षांपूर्वी

    लेख वाचायला मिळत नाहीये, फक्त प्रस्तावना मिळत्ये. काय करता येईल?

  11. Ghananil Kulkarni

      3 वर्षांपूर्वी

    हा लेख पूर्ण वाचता येत नाही. Total article is not opening. Only introduction is readable. Pl check, Thanks

  12. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    शुर मर्दाचा पोवाडा शुर मर्दाने गावा. तसा हा लेख.

  13. Smita.Thakar

      4 वर्षांपूर्वी

    Khup sunder lekh

  14. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    माहिती पुर्ण व संवेदनशील, फारच छान

  15. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम, आरती प्रभूंचे शब्द व ह्रुदयनाथांचा स्वरमेळ काळजाचा ठाव घेतो.

  16. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    Surekh !👌👌👏

  17. ajitpatankar

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय आत्मीयतेने लिहिलेला लेख...इतके संवेदनशील लिखाण आजकाल वाचयला मिळत नाही.. आज सगळच बेगडी.. फक्त कविता-कादंबरीवर साधी वाळवीही जगू शकत नाही. पण फक्त कलेवर जगण्याचं आव्हान तू स्वीकारलं होतंस. आरती! गडकरी किंवा तू जेव्हा लाचार होता, दीनवाणे होता तेव्हा मी खरा शरमतो. आम्हीच तुम्हांला लाचार, दीन करतो नाही? एखादं फिल्म मासिक लाखो रुपये मिळवत असताना, आरती किंवा गडकरी आपल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती केव्हा संपणार या विवंचनेत असतो. लेखातील ह्या वाक्यांनी मन सुन्न झाले... ‘येथे भोळ्या कळ्यांनाही, आसवांचा येतो वास’ ही ओळ दीदी (लता मंगेशकर) गात होती. भारावून किती किती आदरानं मी तुला विचारलं होतं, “आरती, ही ओळ कशी रे सुचली?” “मुलाचा मृत्यू बघून.” तुझं थंड आवाजातलं थंड उत्तर. Our sweetest songs are those that tell of saddest thought. :- Shelley दुर्दैवाने हे खरं आहे..

  18. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला . बरेच दिवस असं संवेदनशील लेखन वाचनात आलं नव्हतं . विशेषतः ऱ्हदयनाथ मंगेशकरांची गाणी ऐकलीय भरपूर पण त्यांनी गद्य काही लिहिलेल वाचलं नव्हतं . खूपच भावूक आणि ऱ्हदयस्पर्शी लिहिलयं त्यांनी . माझ्या कॉलेज जीवनात खानोलकरांचं बरचसं वाचलेलं . त्रिशंकू 'गणूराया आणि चानी (चानी वाचून झाल्यावर रडूच आले होते . )अजगर , नक्षत्रांचे देणे ' ( काव्य ) कोंडूरा या कादंबऱ्या वाचनात आल्या . आवडल्या सुद्धा . पण त्यातील पात्रे खूप पराधीन वाटायची . अर्थात माझाच साहित्यिक दृष्टीकोन जास्त व्यापक नसल्यामूळे ( घडत असल्यामूळे ) आणि लेखका बदल चरित्रात्मक काही न वाचत्यामूळे प्रत्येक पुस्तक स्वतंत्र निर्मिती म्हणून वाचलं गेलं . पण वरील लेखाच्या वाचनाने आरती प्रभूच्या जीवनाची हेळसांड ( परिस्थिती ) वाचून वाईट वाटले . चांगले प्रतिभावंत सुदधा व्यवहारिक जगात पिडले जातात . गांजले जातात . याचेही वाईट वाटते . ( की त्यांच्याकडूनच चिरकाल टिकणारे साहित्य निर्माण होते ? ) असो . पुन्हा एकदा थोडासा भूतकाळ उलगडला . ( माझा ) आजही त्यांची गाणी ऐकताना छान वाटते . त्यांनी दिलेले हे नक्षत्रांचे देणे हिच रसिकांची मिळकत !

  19. spruha

      4 वर्षांपूर्वी

    किती आतून लिहिलेला लेख आहे! फार सुंदर!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen