बाराशे वर्षांत न सुटलेला हिंदु मुसलमान प्रश्न


अंक – रसना दिवाळी अंक १९४७ 

लेखाबद्दल थोडेसे : श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, मग आपण का नाही घालू शकत? एक प्रश्न. तसे असेल तर मग 'घुंघट'वरही बंदी आणली पाहिजे. त्या प्रश्नाला एक प्रत्योत्तर! थोडक्यात काय तर 'हिंदु-मुस्लिम' हा आजही आपल्या राजकीय, सामाजिक जगण्यातला एक कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाशी आपण कधीपासून लढतो आहोत? त्याचा इतिहास काय आहे? या प्रश्नावर शिवाजी महाराजांनी काय उत्तर शोधले होते आणि ते पुढे रेटले गेले नाही त्यामुळे काय झाले? या सर्व प्रश्नांची अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरे इतिहासपंडित प्रो. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लेखात सत्तर वर्षांपूर्वीच दिली होती. अर्थात ती उत्तरेसुद्धा 'राजकीय' ग्रह आणि पूर्वग्रहांना अपवाद नाहीत, परंतु ती निर्विवादपणे अत्यंत महत्वाची आहेत. शेजवलकर हे चाळीस आणि पन्नासच्या दशकातले महाराष्ट्रातील एक अधिकारी आणि व्युत्पन्न इतिहास संशोधक. शिवाजीचे संपूर्ण चरित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्प पुरा होऊ शकला नाही हे दुर्दैव, परंतु त्यासाठी त्यांनी केलेली तयारी हे सुद्धा अभ्यासाचे एक मोठे भांडार आहे. पानिपतावरील ग्रंथ लिहिण्याआधी त्यांनी तो संपूर्ण परिसर पायी धुंडाळला होता. सडेतोपणा, मत व्यक्त करण्यातील निर्भिडता, नेमकेपणा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. २८ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

**********

लेखाला असलेली मूळ संपादकीय प्रस्तावना- प्रो. शेजवलकर हे एक विख्यात महाराष्ट्रीय इतिहासपंडित आहेत. पानिपतच्या १७६१ मधील संग्रामसंबंधीचा त्यांचा अलीकडेच प्रसिद्ध झालेला इंग्रजी ग्रंथ सांप्रत इतिहासज्ञाकडून अभ्यासिला जात आहे. रसनेच्या चालकवर्गावर प्रोफेसरमहाशयांची कृपादृष्टी असली तरी त्यांच्या एक

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , रसना
इतिहास

प्रतिक्रिया

  1. Harihar sarang

      3 वर्षांपूर्वी

    हिंदू मुसलमान प्रश्न सोडविण्यासबंधीची ईतिहास मीमांसा सर्वंकष वाटत नाही। सदर लिखाणात दुरान्वयाने महात्मा गांधींचा संबंध दाखवून शेजावळकरांनी आपल्या पूर्वग्रहाचे दर्शनच घडवून आणले। सदर मीमांसा शेजवलकरांच्या विद्वत्तेला शोभणारी नाही, तसेच हिंदू मुसलमान प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शकही ठरू शकत नाही।

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    इतिहासावरून भविष्याचा वेध घेणारा शेजवळकरांसारखा विरळा ! त्यांच्या भाषेची विरोधकही तारीफ करावयाचे .त्यांचे लेख मार्गदर्शकच आहेत .लेखाला शब्दबंबाळ ,निरर्थक म्हणणे थोरच (!) असण्याचे लक्षण !

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    शेजवलकरांचे महत्व त्यांच्या समकालीन महाराष्ट्राला समजले नाही हे ते भविष्याचा योग्य विचार इतिहासाच्या आधारे करावयाचे .मात्र आता 2019-20 मध्ये एव्हढे अनुभव लेखाच्या काळानंतर (1947)येऊनही ते निरर्थक -शब्दबंबाळ लिहितात असे मराठी वाचकाला वाटणे हे चिंत्य आहे ! त्यांचे विरोधकही त्यांच्या भाषेची तारीफच करत . असो ,आणि असोच दिले पाहिजे !!

  4. SachinBhoir

      5 वर्षांपूर्वी

    लेखावरून हेच प्रतित होते कि शिवाजी महाराजांइतका धुरंधर आणि पुढचे भविष्य जाणणारा नेते भारतात झाले असते तर हिंदूयांना जी ग्लानी आली आहे ती कधीच आली नसती.

  5. shriramclinic

      5 वर्षांपूर्वी

    आत्मनात्मविवेक हे शब्दावडंबर आणि वावदूकपणा होता इथे माझी सहनशक्ती संपली

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    ACKOOL करानी काहीच पुरावे अथवा मुद्दे न खोडता अभिप्राय लिहिणे,यात त्यांची वैचारिक पातळी समजली. त्यांनी या प्रश्ना चे त्यांच्यामते असलेले उत्तर लिहिणे,ही योग्य टीका झाली असती.त्यामुळे त्यांच्या अभिप्राय ने दुसरी बाजू विचार समजले नाही

  7. shripad

      5 वर्षांपूर्वी

    विचार करायला लावणारा लेख आहे।

  8. chandrashekhar

      5 वर्षांपूर्वी

    आता मोदींनी नविन ईतिहास लिहिण्याची पुर्व तयारी केली आहे. आपण सर्व भारतियांनी त्यांना सर्वतसर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक आहे. हर हर मोदी घरघर मोदी. जय शिवराय.

  9. ACKOOL

      5 वर्षांपूर्वी

    शेजवलकर हा काडीमात्र ही किंमत देण्याच्या लायकीचा नव्हे हेच या शब्दबम्बाळ परंतु अर्थहीन लेखातून सिद्ध होत आहे !!

  10. gondyaaalare

      5 वर्षांपूर्वी

    ह्या नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .मवाळ धोरण मागे पडून त्याच्या पुढली लांगूलचालन पद्धत अमलात आली . मतांवर नजर ठेवून सर्रास राज्याचा गाडा चालू लागला . ह्यात भविष्यात काही बदल होतीलसं वाटत नाही .शेजवलकरांनी योग्य वेळी धोक्याची सूचना दिली होती हे या लेखावरुन स्पष्ट होते .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen