गांधीजींचा शोक आपण विसरतां विसरूं शकणार नाहीं कधीं. ते ७९ वर्षांचे झाले होते, पण 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' हें त्यांच्या बाबतीत कधीं आपल्या मनांतहि येऊ शकले नव्हते; कारण त्यांनीं शरीर धारण केलें होतें हेच मुळी आम्हीं विसरलों होतों. ऊन, थंडी, वारा, जिव्हालौल्य, करमणूक, संसारसुख यांतली तुम्हां-आम्हांला लागू पडणारी कुठलीच कल्पना त्यांना लागू पडत नव्हती. अमुक वर्षे नोकरी केली कीं, आपण विश्रांति हा आपला हक्क समजतों, पण ज्याने आजन्म प्रत्येक क्षण तुमच्या-आमच्या उद्धारासाठीं वेंचला, त्यानें शेवटपर्यंत पेन्शनर होण्याची कधी मागणी केली नाहीं. थोडेसे कांहीं नांव घेण्याजोगें केलें कीं, आम्ही आमचा गौरव व्हावा म्हणून तळमळू लागतों,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .