वयम्

शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट हे ‘वयम्’चे प्रकाशक आहेत. त्यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ सुरू झाले आहे.

 

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे, श्रीकांत वाड. ‘वयम्’च्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव आणि नामवंत चित्रकार निलेश जाधव ‘वयम्’चे कलात्मक बाजू सांभाळतात.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

वयम्

‘भूत’ आणि भविष्य

श्रीकांत बोजेवार | 25 Dec 2022

भुतानं मंत्र म्हणायला सुरुवात केली, “पुस्तकम्... अक्षरम्... टप्पूनम्... डोकम्...पुस्तकम्...अक्षरम्...टप्पूनम्...डोकम्... ”मंत्र म्हणून झाल्यावर भूत म्हणालं, “आता डोक्यावरचं पुस्तक काढून बघ.” टप्पूनं पुस्तक काढलं आणि पाहिलं तर पुस्तकातली सारी अक्षरं गायब होती. “अरे, ही तर कोरी पानं आहेत... ”

उत्तम संगोपन करणारे बाबा-प्राणी!

सुबोध जावडेकर | 20 Dec 2022

अंडी खायला एखादा मासा आला तर त्याला पळवून लावतो. दोन महिन्यांनी अंडी उबून पिल्लं बाहेर आली की त्याची ड्युटी संपते. मग तो स्वतःला त्या दगडापासून सोडवून घेतो आणि पुन्हा इकडे तिकडे वाहात जातो. अपार कष्ट घेऊन मुलाचं संगोपन करणाऱ्या या सगळ्या बाबांमधे ‘सर्वांत उत्तम पिता’ म्हणून प्रथम क्रमांक कुणाचा लावायचा?

अक्षरबाप्पा!

क्रांती गोडबोले-पाटील | 09 Sep 2022

ज्या शाळेच्या पटांगणावर राज सरांना मस्तीखोर मुलगा म्हणून शिक्षा झाली होती, त्याच पटांगणावर २०१८ साली शाळेने त्यांचा सत्कार केला. तो दिवस त्यांना फार सुखावून गेला. लॉकडाउनमध्ये लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, ते घरातून अक्षरगणेश रेखाटून दाखवत होते. सोशल मिडियावर राज सरांनी साकारलेल्या अक्षरगणेशचे फोटोज आणि व्हिडिओज पाहायचे असल्यास-फेसबुकवर RAJ KANDALGAONKAR@aksharganesh Artist सर्च करा आणि Instagram वर akshar.ganesh.kalakar सर्च करा. तुम्हांलाही तुमचं नाव अक्षरगणेश स्वरूपात हवं असल्यास सोशल मिडियावरून त्यांच्याशी संपर्क साधा.

आनंदाने भरलेली दप्तरं!

युवराज माने | 05 Sep 2022

या वाचनाच्या आनंदसोहळ्यात काही लेखक माझ्या लेकरांशी संवाद साधू लागले. सुरुवात झाली ती डॉ. आ. ह. साळुंखे व प्रवीण दवणे सरांपासून. या दोन्ही शब्दप्रभूंनी आमच्या लेकरांवर एक अमूल्य संस्कार केला, तो म्हणजे ‘कृतज्ञता’! या दोघांच्या कथा मुलांना खूप आवडल्या. त्यामुळे त्यांना आमच्या लेकरांनी पत्र लिहिलं. लेकरांच्या पत्रांना उत्तरं देताना त्यात त्यांनी लेकरांना सांगितलं, “बाळांनो, ज्यांनी तुम्हांला ज्ञान दिलं, आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा, कृतज्ञता हा मोठा संस्कार आहे.” यातूनच पत्रमैत्री, पेनमित्र, शिदोरी, अमृतकण हे विविध उपक्रम सुरू केले. या उपक्रमांच्या माध्यमातून माझी लेकरं अनेक यशस्वी व कर्तबगार मान्यवरांशी संवाद साधू लागली.

लांबकान्या मुलाची गोष्ट

सोनाली नवांगुळे | 10 Aug 2022

कान पूर्वीसारखे होईपर्यंत शाळा तर चुकवता येणार नव्हती. म्हणून दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना कान्हा आईची चिठ्ठी घेऊन गेला. थोडेदिवस टोपी घालून शाळेत यायची परवानगी त्यात मागितली होती. त्याच्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं, पण ती काही बोलली नाही. मुलं मात्र त्याला चिडवत होती. मैदानावर खेळायच्या तासाच्यावेळी वर्गातली दोन मुलं झाडाखाली उभं राहून आपसात कुजबुजताहेत हे दिसल्यावर कान्हाची सवय उफाळून आली. तो लगेच झाडामागं जाऊन त्यांचं गुपित कळून घेण्याचा प्रयत्न करायला लागला ... आणि नवल घडलं. आधीच सशासारखे लांब झालेले कान्हाचे कान दुप्पट वाढले. टोपी उडून जमिनीवर पडली. सगळी मुलं त्याच्याकडं पाहून ओरडायला लागली ... “हे हे लांबकान्या लांबकान्या सतत चोरून ऐकून ऐकून बघा कान्हाचे कान कसे गाढवासारखे झालेत...”

जल बिन मछली

मकरंद जोशी | 06 Aug 2022

ओहोटीच्या वेळी खाडीच्या किनाऱ्यावर हळूहळू चालणाऱ्या निवट्या पाहिल्या आहेत? दोन पायांच्या मदतीने त्या दुडूदुडू चालत आहेत असंच वाटतं. प्रत्यक्षात निवट्यांना पुढचे पर (पेक्टोरल फिन) असतात. त्यांच्या आधारे निवट्या चिखलातून चालू शकतात. त्या दोन फुटांपर्यंत उड्याही मारू शकतात.

सापांना 'अभय' देणारा मित्र

अंजली कुलकर्णी- शेवडे | 02 Aug 2022

सापांना गंधज्ञान नसतं, त्यांना ऐकू सुद्धा येत नाही मग गारुड्याने पुंगी वाजवली की साप कसा डोलतो हा एकदम नागपंचमी स्पेशल प्रश्न माझ्या मनात होताच. अभय काकांनी आमच्या गप्पा संपता संपता सांगितलं की गारुडी त्यांच्या त्या पुंगीला एखादी गडद रंगाचा गोंडा किंवा कापडाचा तुकडा वगैरे बांधतात. साप त्या रंगाकडे बघून डोलतो!

दीप से दीप जलाओ...

कांचन वाटवे-जोशी | 29 Jul 2022

आपल्याला दुःखी करणाऱ्या घटना घडत असतातच. पण अशावेळी आपल्यापेक्षा जास्त आघात झालेल्या व्यक्तीकडे दृष्टी वळवली तर अचानक वेगळा दृष्टिकोन मिळून जातो...

खारट समुद्राची गोष्ट!

रेणू दांडेकर | 25 Jul 2022

एकानं चूळ भरली. सगळं तोंड खारट झालं. तो धावतच सुटला. दमून सगळी मुलं वाळूत बसली. हातानं वाळूचे आकार करू लागली. एकदम शांतता. ‘समुद्राचं पाणी खारट का असते?” “कारण त्यात क्षारांचं प्रमाण जास्त असतं..” “समुद्राच्या पाण्यातच हे प्रमाण जास्त का? नद्यांचं पाणी गोड, पाऊस गोड नि समुद्र खारट का?”

बेबी टर्टलची शाळेत एंट्री

Anujac | 17 Jul 2022

बेबी टर्टल एकदम छोटुसं असतं. मोठ्या माणसांच्या हाताच्या पंजाच्या निम्मं कदाचित. त्याला उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्याला उन्हं वर चढायच्या आधी शाळेत जावं लागतं. एकदा ते शाळेत पोहोचलं की, मग त्याला हळूहळू निसर्गआज्जोबा उन्हाला कसं तोंड द्यायचं ते शिकवतात. बुलीजपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं तेही ते बेबी टर्टल शिकतं. पण त्यासाठी त्याला आधी शाळेत जावं लागतं.

पावसाच्या धारा येती झराझरा....

भारती सिनकर | 13 Jul 2022

पाऊस आपल्याला 'जीवन’ देतो. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगणे. त्यामुळे पाऊस ख:या अर्थाने जीवन देतो, असे म्हटले पाहिजे. तो त्याच्या वर्षावातून आपले सर्वस्व अर्पण करीत असतो. जणू तो आपल्याला संदेश देतो की, इतरांचे जीवन सफल करा. आपल्याकडे आहे ते इतरांना भरभरून द्या. सर्वांना समृद्ध करा. आनंदी व चैतन्यमय वातावरण निर्माण करा. 'त्यागातच सुख असते,’ हा बहुमोल विचार पाऊस आपल्या कृतीतून व्यक्त करतो.

पहिल्या दिवसाचं टेन्शन

डॉ. शुभांगी दातार | 09 Jul 2022

काहीतरी त्याच्या मनात चाललंय ह्याचा आईला अंदाज आला. ती म्हणाली, “ठीक आहे. नाही वाचणार पण एवढं तुला लिहायचंय तरी काय? तू फार फार तर काय लिहिणार-शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, पिकनिक, टिव्ही, कार्टून्स, इ....’’ आईने भलामोठा पाढा वाचला. “प्रॉमिस हं प्रतीक, मी तुझी डायरी नाही वाचणार. पण मला एक सांग, कलेंडरवर ही एवढी मोठी खूण का केली आहेस? आणि ती पण काळ्या पेनने?’’

पाठ्यपुस्तक..एक छळवाद

राजीव तांबे | 06 Jul 2022

आम्ही मुले सर्जनशील असल्याने, पाठ्यपुस्तकांचा उपयोग अम्ही विविध प्रकारे केला. आमच्यावेळी पुस्तके रंगीत नव्हती. त्यामुळे पुस्तकातील चित्रात रंग भरण्याचे काम आम्हालाच करावे लागे. चित्र रंगवल्यानंतर मूळ चित्र ओळखताच येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असू. माणसाचे प्राण्यात, फळात, झाडात किंवा एखाद्या वस्तूत रुपांतर करत असू. एकदा आमच्या विज्ञानाच्या बाईंनी आम्हाला 73 वे पान उघडायला सांगितले. सहज म्हणून बाईंनी माझ्या चित्रकार मित्राचे पुस्तक हातात घेतले आणि 73 वे पान पाहून त्या जोरदार किंचाळल्या. ती किंचाळी ऐकून बाजूच्या वर्गातील दोन शिक्षक धावत आले. ते 73 वे पान पाहून सार्याय वर्गासोबत ते शिक्षक पण खिंकाळू लागले! 73 व्या पानावर डार्वीनचा उत्क्रांतीचा सिध्दांत होता. तिथेच भरघोस दाढी मिशावाला डार्वीनचा मोठा फोटो ही होता. माझ्या चित्रकार मित्राने त्या मूळ डार्वीनच्या चित्राचे एका भयंकर सरड्यात रुपांतर केले होते. अशा प्रकारे डार्वीनचीच उत्क्रांती होईल याची सुतराम कल्पनाच नसल्याने बाई भलत्याच टरकल्या होत्या. मग बाईंनी माझ्या मित्राला डार्वीन ही पदवी दिली. आणि या ‘डार्वीनला’ उत्क्रांतीचा सिध्दांत पट्टीच्या मदतीने पाठीवर समजावून दिला.

गंध पावसाचा

डॉ. बाळ फोंडके | 03 Jul 2022

'तर पावसाचा थेंब या छिद्रांवर, पोकûयांवर पडतो तेव्हा तिथली हवा कोंडल्यासारखी होते. तिचे बुडबुडे तयार होतात...” ''...आणि ते वरच्या दिशेनं जाऊ लागतात. सोड्याची बाटली उघडल्यावर तिच्यातले बुडबुडे जातात तसे.” सगळेजण एकसाथ कोरसमध्ये म्हणाले. मीही हसतहसत त्यांना दाद दिली. पूर्वी कधीतरी त्यांना सोडा का फसफसतो हे मी सांगितलं होतं. चांगलं लक्षात ठेवलेलं दिसतंय यांनी. ''पण हे बुडबुडे साधे नसतात. त्यांच्यात फक्त हवा नसते.”

छत्रीछप्पर मुर्दाबाद!

अनंत काणेकर | 30 Jun 2022

छत्री घेण्याचा उद्देश पावसाळ्यात स्वत:चा पाण्यापासून बचाव करणं हा आहे असं पुष्कळांना वाटतं, पण ती केवळ स्वत:ची फसवणूक आहे. छत्रीशिवाय आपण पावसात जितके भिजतो तितकेच, किंबहुना बरेच वेळा थोडे अधिकच छत्री असताना भिजतो. त्याशिवाय ती हरवली, मोडली, उडाली किंवा उलटी झाली म्हणजे नाना प्रकारचा मनस्ताप होतो तो वेगळाच.

न दिसणारं आणि न फुलणारं फूल

मकरंद जोशी | 24 Jun 2022

उंबराचं फूल दिसत नाही, कारण त्याचं फळ हेच फुलाची भूमिकाही बजावतं. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर कोणी दुर्मीळ उंबराचं फूल (!) म्हणून फॉरवर्ड पाठवला तर लगेच डिलीट करा आणि कुणी विचारलं की उंबराचं फूल पाहिलंय का, तर बिनधास्त ‘हो’ म्हणून सांगा.

अत्यंत बुद्धीमान

मेघना जोशी | 13 Jun 2022

हळूहळू काय झालं माहीत नाही, प्राण्यांच्या आई-बाबांना वाटायला लागलं की, माझं पिल्लूच सर्वांमध्ये सर्व बाबतीत पुढे असलं पाहिजे. त्याच्यापुढे कोणीही जाता कामा नये. म्हणून त्या आई-बाबांचीच चढाओढ लागली.”

छोटी छोटी ध्येय

डॉ. शुभांगी दातार | 10 Jun 2022

ध्येये ठरवली की त्यामध्ये नियोजन, शिस्त, सातत्य, सराव, समाधान, आत्मविश्वास अशा अनेक गोष्टी शिकता येतात. यश आल तर समाधान मिळत. अपयश आलं की दुसरा मार्ग शोधता येतो.

मानवनिर्मित जंगल

मेधा आलकरी | 06 Jun 2022

जंगलकन्या डॉ. कीर्ती कारंथ- मध्यंतरी एका जंगलकन्येची बातमी वाचली. तिचं नाव आहे डॉ. कीर्ती कारंथ. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने २०१५ या वर्षातील “जग बदलू पाहणाऱ्या” १५ महिलांची नावं जाहीर केली. त्यात हे भारतीय नाव आहे, याचा मला खूप अभिमान वाटला. गेली २५ वर्ष कीर्ती, गळ्यात दुर्बिण आणि कॅमेरा लटकवून जंगल भटकते, नोंदी घेते, निष्कर्ष काढते. अभ्यासातून, वन्य प्राण्यांचं आणि माणसांचं हित कसं जपावं याचा समतोल साधण्याच तंत्र तिला जमलय. म्हणून हा पुरस्कार. तिच्या ह्या शास्त्रशुद्ध नोंदीच्या आधारे पर्यावरण संवर्धनाच्या योजना राबवल्या जातात.

जरा थांबा! दुर्बीण ‘तयारी’करत आहे...

श्रीराम शिधये | 30 May 2022

‘नासा’ने ‘एल२’पाशी एक शोधक यान या शतकाच्या सुरुवातीलाच पाठवलं होतं. पण त्या सर्वांपेक्षा आता पाठविण्यात आलेली दुर्बीण महत्त्वाची आहे. याचं कारण ती महास्फोट झाल्यानंतरच्या काळातल्या घडामोडी ‘पाहू’ शकणार आहे.

निसर्ग नवल- मरणात यांच्या जग सजते...

मकरंद जोशी | 13 May 2022

रेशमाच्या पतंगांपासून रेशीम मिळवायचे तर त्यासाठी कोष गरम पाण्यात टाकावे लागतात, त्यानंतरच हा धागा सुटा होतो. यामध्ये त्या कोषातील पतंगाची अळी मरण पावते. जेव्हा रेशमाची मागणी वाढली आणि त्यातील आर्थिक फायदा लक्षात आला, त्यानंतर मग रेशमाचे धागे बनवणाऱ्या अळ्यांची ‘लागवड’ करायला सुरुवात झाली. आता जगभरात वेगवेगळ्या जातीच्या पतंगांच्या अळ्या वाढवून त्यांच्यापासून रेशीम मिळवले जाते.

मिशन एक्स

सुरेश वांदिले | 09 May 2022

“याचा अर्थ, करोना विषाणूला हरवण्याचं जैवशास्त्रीय तंत्र त्यांनी अवगत केलं. याचा दुसरा अर्थ, हा करोना विषाणू कितीही रूपांतरं करू लागला तरी प्रा. सारा या जैवशास्त्रीय तंत्राचा वापर करून आणखी प्रभावी लस शोधू शकतात,” तेजोमयी म्हणाली.

महामानव

मंजिरी हसबनीस | 12 Apr 2022

भगवान महावीरांनी सदैव अहिंसेचा प्रचार केला आणि तरीही ते महावीर कसे ? तर सदैव ते स्वतःमधील मोहाशी लढले. इंद्रियांवर विजय प्राप्त करून ते जिन (जिंकणारे) झाले आणि त्यांनी जो धर्म स्थापन केला, तो जिनांचा धर्म म्हणून जैन होय.

वेगळेपणाचे गुपित!

विद्याधीश केळकर | 08 Apr 2022

ही सगळी माहिती आपल्याला समजली कशी? माणसाच्या पेशीच्या आत असणाऱ्या छोट्याशा DNAबद्दल आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती झाल्या? याला कारण आहे, १९९० साली जगभरातल्या संशोधकांनी एकत्र येऊन सुरू केलेला Human Genome Project (ह्युमन जीनोम प्रोजेक्ट!) या प्रोजेक्टचा उद्देश होता, मानवी शरीरातील प्रत्येक अन् प्रत्येक जीनचा अभ्यास करणं, प्रत्येक जीनचं कार्य शोधून काढणं आणि मानवी DNA चा संपूर्ण Sequence म्हणजेच Nucleotidesची मांडणी शोधून काढणं. जवळपास १३ वर्षं हा अभ्यास चालू होता.
Install on your iPad : tap and then add to homescreen