लौकिक दृष्टीने त्यांची हत्या झाली. आपण त्यांना हुतात्मा म्हणून या अर्थाने गौरवता की आपल्या ध्येयासाठी ते बळी गेले. या दोन्ही समजुती आपापल्या परीने वास्तवच आहेत. पण जीवनेच्छा नष्ट होणे आणि तीही आपण इच्छामरणी आहोत असा आत्मविश्वास असलेल्या गांधीजींसारख्या महान आत्म्याची होणे हाच त्यांच्या बाबतीत मृत्यू समजला पाहिजे. १९४७ च्या मार्चपासून १९४८ च्या जानेवारीपर्यंत तो दहा महिन्यांचा काळ त्यांनी विलक्षण मनस्तापात काढला. स्वातंत्र्य आले, पण ते यादवी आणि विच्छेदन घेऊन! विद्वेष आणि हिंसा यांचे थैमान घेऊन ! स्वातंत्र्याच्या आगमनाच्या मंगल समयी ही अनर्थपरिणामी निराशा आपल्या कपाळी येईल असे त्यांना वाटले नव्हते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Harihar sarang
12 महिन्यांपूर्वीऔपनिषिदिक तत्त्वज्ञानाचे साकार रूप म्हणजे महात्माजीं। महात्माजींचा परमेश्वर शोषितपिडीत माणसांत वास करून राहिला होता। म्हणून ते ईश्वराच्या शोधासाठी शेवटपर्यंत शोषितांच्या सेवेत राहिले।
Hemant Marathe
12 महिन्यांपूर्वीएका वेगळ्याच अंगाने गांधी कळले.