अंक : जडण-घडण, जून २०२१
आपल्या देशात एक काळ असा होता की, पालक मुलांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. अगदी लहानपणापासून (साधारण ८ ते ९ वर्ष वयापासून) ते २४ वर्ष वयापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असत. या ठिकाणी शस्त्र, विद्या, संस्कार, आध्यात्मिक संस्कार अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात असे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली तशीही शिक्षणाच्या पद्धती पूर्णपणे नाहिशी झाली. मागील १० ते १२ वर्षात इंटरनेट तसेच तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे डिजिटल शिक्षण सुरू झालं. या शिक्षणात प्रथमत: संगणकाचा उपयोग करणं पीपीटीद्वारे सुरू झालं. अभ्यासक्रमातील विविध गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या करून सांगण्यात/दाखवण्यात यश येऊ लागलं. पुढे ई-कॉन्टेट, विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर वापरून अध्यापनाची तसेच अध्ययनाची परिणामकारता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळा आपल्या पद्धतीने धडपड करू लागल्या. इंटरनेटचं जाळं घट्ट झाल्यानंतर देशातील शाळांमधील आवश्यक असलेली सगळीच माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकत्र करण्यात येऊ लागली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jaysingrao Pawar
4 वर्षांपूर्वीJaysingrao Pawar
4 वर्षांपूर्वीअतिशय छान लेख आहे