वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी

पुनश्च    अनंत तडवळकर    2020-09-23 06:00:14   

अंक : अमृत, मार्च १९६५ लेखाबद्दल थोडेसे : आज आपल्याला वाई हे शहर मुख्यतः आठवतं ते तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशी यांनी वाईतील प्राज्ञपाठशाळेतून  विश्वकोशाचा महान प्रकल्प सिद्धीस नेऊन मराठी भाषेवर करुन ठेवलेल्या अनंत उपकारांमुळे. वाईमध्ये एकेकाळी अशा  पंधरा-वीस तरी पाठशाळा नक्कीच होत्या, असे म्हणतात. अलिकडे महाबळेश्वरला लोकांचे जाणे येणे वाढल्यापासून लोक वाईलाही जाऊन येतात, कारण 'स्वदेस' या चित्रपटानंतर या परिसराविषयीचे आकर्षण वाढले आहे. तिसरी महत्वाची बाब आहे मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाईपासून काही किलोमिटर्सवर असलेला हा वाडा पहायलाही अनेकजण जातात. तर अशा वाई या शहरात एकेकाळी कसे धार्मिक वातावरण होते, तेथील लोकजीवन कसे होते याचा हा अतिशय रंजक असा लेखजोखा आहे. या लेखात 'एकेकाळी' असा उल्लेख करुन वाईचे जे वर्णन केले आहे ते सत्तर वर्षांपूर्वीचे. आता हा लेख प्रकाशीत होऊन पंचावन्न वर्षे झाली आहेत, म्हणजे या लेखातली वाई १२५ वर्षांपूर्वीची आहे. या लेखात सांगितलेले लोकजीवन आता केवळ इतिहासातच आहे, परंतु ५५ वर्षांपूर्वीच्या या वर्णनातील अनेक खाणाखुणा मात्र आजही दिसतात. हा लेख वाचताना आपल्याला काळयंत्रात बसून १२५ वर्षे मागे गेल्याचा भास होतो.. ******** आता वाईमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. वीज, पाणी, घरें यांच्या अनेक नव्या सुखसोयी वाईकरांना उपलब्ध झालेल्या आहेत. शाळेतल्या शिक्षणपद्धतींतही बदल झाला आहे. लोकांची राहणी, पोशाख बदलले आहेत. नव्या चालीरीतींचा उदय झालेला आहे. विचार बदलले आहेत. जुन्या काळाच्या कांही खुणा सोडल्या तर वाईचे स्वरूप खूपच बदलले आहे. सत्तर वर्षांपूर्वी या बदलाची मुळीसुद्धा कल्पना आली नसती, इतके ते वेग

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , स्थललेख , अनुभव कथन , अमृत

प्रतिक्रिया

  1. gvom53@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान वाई डोळयासमोर उभी राहिली 👍👍

  2. mailimaye@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    Mast !

  3. mukunddeshpande6958@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    छान, आठवणी

  4. hemant.a.marathe@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान

  5. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    ंखूप माहीतीपूर्ण लेख ; वर्गात जाऊन नवरे शोधणे आणि विडीवरचा हिरवा करदोटा काढला की विडी सोवळी होते, या नवीन माहीतीने खूप करमणूक झाली ं बालपणीच्या कोकणातील काळ आठवला

  6. sugandhadeodhar

      6 वर्षांपूर्वी

    125 वर्षापूर्वीचे समाजजीवन कस होतयाची कल्पना करता आली. 50 वर्षापूर्वी अनुभववलेले कोकणातले उत्सव आठवले.

  7. suhasnannajkar07@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    खुप सुंदर वर्णन वाई चे केले

  8. ananturmi@rediffmail.com

      6 वर्षांपूर्वी

    प्रथमतः मराठी सारस्वताच्या महासागरातून वेचून काढलेले' जे जे उत्तम, ते ते 'चोखंदळ वाचक आणि मराठी साहित्यप्रेमी समोर आपण मांडत आहात या बद्दल आपले अभिनंदन! असा उपक्रम माझ्यातरी माहितीत 'यासम हा' असाच आहे. अशा वेधक साहित्यात माझ्या 55 वर्षापूर्वीच्या 'वाई सत्तर वर्षापूर्वी 'या लेखनाचा समावेश झाला याबद्दल खूप आनंद वाटतो या पून:प्रकाशनाने त्यावेळच्या खूप जुन्या आठवणी 'दादा 'परचुरे 'यांच्यासह जागा झाल्या .राजा भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे 'कालो न याता वयमेव याता 'यातली विरक्ती खरी असली ,तरी तरी त्यामुळे त्यामुळे reminiscences are always beautiful हे विधान खोटे ठरत नाही, याचाच प्रत्यय आला. आपल्या उपक्रमास अनंत शुभेच्छा! अनंत तडवळकर

  9. shripad

      6 वर्षांपूर्वी

    डोहातून भांडी येणे, बाणांचे युद्ध अशा गमतीशीर गोष्टी कळल्या.

  10. vivekvaidya1878

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम शब्दांकन ... तो काळ साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला !!!

  11. asbhat1963@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    आमचे घर मघल्या आळीत आहे. उत्सवात पुणेचा मान आमच्या घराण्यात आहे. मघल्या आळीची देवी सासुबाई मानतात , म्हणून फक्त ही देवी बसलेली आहे. बाकी सर्व देवी उभ्या आहेत. संजय भट

  12. Diwakar

      6 वर्षांपूर्वी

    मनोरंजक...पण चिठ्ठी टाकल्यानंतर डोहातून भांडी वर येत असे ... हे कसे काय ... समजले नाही ... धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen