अंक - आलमगीर, दिवाळी अंक १९५९
“मी एक शेतकरी होतो. माझं शेत एका डोंगराच्या पायथ्याला होत. एकदां शरद् ऋतूंत मी शेतावर काम करीत असतां क मदोन्मत्त हत्ती माझ्यावर चालून आला. जीवरक्षणासाठी मी जवळच्याच एका तिळाच्या झाडावर चढलो. पण हत्ती माझा पिच्छा सोडीना. त्यानं तिळाच्या खोडाला आपल्या सोंडेचा विळखा घालून ते झाड पाडायचा प्रयत्न केला. झाड कांही पडलं नाही; पण गदगदा हालल्यामुळे त्याच्यावरचे तीळ मात्र सगळे खाली पडले. हत्तीनं झाडाभोवती रिंगण धरलं होतं, त्यामुळे ती तिळांची रास चिरडली गेली. त्यामुळे त्या तिळांतून तेलाची नदी वाहू लागली. खाली राहिली पेंड. ती बिलबिलित होती. हत्तीचे पाय त्या पेंडीच्या लगद्यात रुतले आणि तो तडफडून मेला. मी लगेच झाडावरून खाली उतरलो. मला लागली होती भूक. मी पहिल्या सपाट्याला दहा घडे तेल पिऊन टाकलं. मग त्या हत्तीचं कातडं सोलून त्याची पखाल बनवली आणि ती तेलाने भरून घेतली. मग घरी जायला निघालो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Shriniwas Kalantri
4 वर्षांपूर्वीछान .
Prakash Ghatpande
4 वर्षांपूर्वीसुंदर कथा. मानवी स्वभावाचे धूर्त पैलू त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अगदी मनोरंजक.
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीयुक्ती मोठी.चांगल्या व वाईट कामासाठी.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान लेखन - आवडले . खरचं असं लेखन करायला उच्च दर्जाची काचना शक्ती असायला हवी
वाह.. अप्रतिम.. अशा अविश्वसनीय कथांची रचना करणे कठीण काम आहे.. हरिभद्रसुरीची ही कथा वाचून आनंद झाला..