‘कौंतेय’ नाटकांतील कर्ण ! - पूर्वार्ध


कौरवांचे सेनापति द्रोणाचार्य निधन पावतात. त्या रात्रीं दुर्योधनाचा दरबार भरलेला असतो. द्रोणाचार्यांनंतर सेनापति कुणाला करायचें याचा खल दरबारांत असतो. दुर्योधनाची अिच्छा कर्णाला सेनापति करण्याची चालू असते. आपली अिच्छा निश्चयी शब्दांत तो दरबारांत घोषित करतो. त्याची ही घोषणा दरबारांतील क्षत्रिय राजे, आचार्य गण व अितर प्रतिष्ठित मानकरी यांना पसंत नसते. कर्णाच्या सेनापतीपदाला कृपाचार्य, शल्य अित्यादि नेते विरोध करतात. कर्णाच्या अकुलीनपणावर त्यांचा मुख्य आक्षेप असतो. 'प्रतिष्ठितांचा पुढारी प्रतिष्ठितच पाहिजे.' असें मत सर्वसाधारण दरबाराचें असतें. दरबाराचें हें मत ऐकून दुर्योधन रागावतो. कर्णाला सेनापती केल्याविना पांडवांचें निर्दालन होणार नाही असे त्याला वाटत असते व त्यामुळे दरबाराला तो पुन्हापुन्हां कर्णाचे नेतृत्व मान्य करण्याची विनंती करतो. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen