संभाजी कलशाच्या पूर्णपणे आधीन झाला असावा असें वाटत नाहीं. पण संभाजीचें निकट साहचर्य व कबजीचें संभाजी राजाजवळ असलेलें वजन या दोन गोष्टींचा कबजीनें जास्त फायदा घेऊन त्याचा स्वार्थपरायणतेनें जास्त गवगवा करून इतर लोकांत त्यानें आपल्यासंबंधीं वचक निर्माण केला असावा. त्यांतच संभाजीच्या उग्रप्रकृतीमुळें व राज्यावर आल्याबरोबर त्यानें केलेल्या भयप्रद कृत्यांमुळे संभाजीच्या विरुद्ध गोटांतील म्हणजे सोयराबाईंच्या बाजूंकडील लोकांना व तटस्थवृत्ती ठेऊन राहिलेल्या इतर सर्व कर्त्या मंडळींना संभाजीशीं संबंध ठेवतांना संकोच वाटू लागल्यामुळे ही मंडळीसुद्धां आपली सर्व कामकाजें या त्रयस्थ व संभाजीच्या विश्वासांतील कबजीकडून करून घेऊं लागलीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .