सुमारे अकरा कोटी मराठी भाषक असलेल्या महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्नांवर शंभर माणसे संघटित करतानाही दमछाक होते आणि जातिधर्माच्या मुद्द्यावर साधी शिट्टी मारली तरी हजारो लोक आपल्या प्रतीकांसह स्वयंप्रेरणेने एका झेंड्याखाली येतात हा कुठला महाराऱष्ट्र आहे? महाराष्ट्रात चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतके धर्मसुधारक आणि फुले, आंबेडकरांपासून इतके समाजसुधारक होऊन गेले तरी त्यांच्यापासून आपण काहीच शिकलो नाही? कोठून आला हा जात्यभिमान आणि धर्माभिमान? याचा परिणाम म्हणा किंवा परिणती म्हणा भाषेचे राजकारण करणारे राजकीय पक्षही आज जातिधर्माच्या वळचणीला गेलेले दिसतात. भाषेच्या प्रश्नावर मते मिळत नाहीत किंवा ती जातही नाहीत असा त्यांचा अनुभव आहे. आपल्या देशात मराठी भाषकांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या ध्रुवीकरणातून निवडणुका जिंकता येतात असा आत्मनिश्वास निर्माण झाल्यानंतर शिवसेनेसारख्या मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षानेही मराठीचा हात सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला हे आपण पाहतोच आहोत. राज्यात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ, किंवा मुंबईत मराठीसाठी भाषा भवन निर्माण होण्यापेक्षा अयोध्येत राममंदिर निर्माण होणे हा शिवसेनेचा अग्रक्रम बनतो आणि मराठी भाषक हिंदूंचा त्याला पाठिंबा मिळतो हा या पक्षाचा दोष नाही तर तो स्वतःची भाषिक ओळख विसरलेल्या मराठी समाजाचा आहे...------------------------------------------------------------------------------
९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीमार्मिक माहितीपूर्ण लेख
jspalnitkar
6 वर्षांपूर्वीअत्यन्त संतुलित आणि प्रभावी लेख. दिब्रिटो प्रकरणाचा संदर्भ घेऊन एका अतिशय महत्त्वाच्या पण चिंताजनक सामाजिक वास्तवावर अचूक भाष्य केलं आहे. धन्यवाद परब साहेब आणि धन्यवाद बहुविध!!
Attam
6 वर्षांपूर्वीखुपच छान....माहितीपूर्ण.. विरोध करणारांनी नक्की वाचावा...
उन्मेष
6 वर्षांपूर्वीसंमेलन मराठी साहित्याचे आहे की हिंदू धर्माचे आहे?
संजय रत्नपारखी
6 वर्षांपूर्वीसध्याचा दिब्रोटा यांना होणारा विरोध साहित्यिक पातळीवर कमी आणि धार्मिक पातळीवर अधिक आहे. डॉ. परब यांनी ऐतिहासिक दाखले देत इतर धर्मियांचे मराठीसाठीचे योगदान मांडले आहे. लेख चांगला असून अनेकां पर्यंत तो जावा.
Aarti Nitin Gawade
6 वर्षांपूर्वीमराठी भाषेसाठी योगदान करणारे सर्वच सन्मानास प्रात्र आहेत. ते कुठल्याही धर्माचे असो. भाषा विकासात धर्म येता कामा नये.
मनोज देशमुख
6 वर्षांपूर्वीअत्यंत मार्मिक ...