पहिले ते मराठीकारण - का नको भाजपची एकहाती सत्ता?


भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचं, तेही रचनात्मक टीकापर बोलायचं; आणि तरीही स्वतःला देशद्रोही म्हणवून घ्यायचं नाही, ह्या कसरतीचा प्रयोग आता मला करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष हा आजच्या घडीला महाराष्ट्रातील सगळ्यात प्रबळ पक्ष आहे. २०१४ साली या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. म्हटलं तर ते शिवसेनेबरोबरचे सरकार आहे अन्  म्हटलं तर त्याचं स्वतःचं सरकार आहे.  असं म्हणण्याचं कारण जवळपास एकखांबी तंबूसारखे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात हे सरकार चालवलेलं दिसतं. भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनसंघाचा वारसदार पक्ष आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्या जनता पक्षाच्या सरकारमधला जनसंघ हा एक महत्त्वाचा साथीदार घटक होता. अनेक मतभेदांमुळे जनता पक्षाचे सरकार पडलं. त्यानंतर जनसंघ विसर्जित झाला आणि त्या जनसंघामधनं भारतीय जनता पक्ष नावाचा नवीन पक्ष १९८० साली स्थापन झाला. या पक्षाची सुरुवातीची वैचारिक धाटणी गांधीवादी समाजवाद (Gandhian Socialism) अशा प्रकारची होती. अटलबिहारी वाजपेयी हे त्या पक्षाचे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या सगळ्या मंडळींनी हा पक्ष उभा केला आणि या पक्षाला उभारी दिली. या पक्षाला संघटनात्मक बळ दिलं ते लालकृष्ण अडवाणी यांच्या राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, विश्वनाथ प्रतापसिंग यांचं ‘तीन पायांवर चालणारं सरकार’ असं ज्याचं वर्णन केलं गेलं होतं, त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक पार्टनर किंवा एक सहभागी पक्ष होता. पण राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर, कारसेवेच्या मुद्द्यावर त्या पक्षाने हे सरकार पाडलं. त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जन ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.एकहाती सत्ता असण्याचे धोके नेमकेपणाने मांडले आहेत.

  2. हनुमंत

      5 वर्षांपूर्वी

    मध्यम वर्ग यांना चिंतन आणि मनन कराया लावणारा लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen