संपादकीय - धर्मकारण की भाषाकारण?


आज मराठी भाषा संकटात आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील मराठी शाळा बंद पडत आहेत. ह्या परिस्थितीला एकटी शिवसेना जबाबदार नसली तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी जिच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाऊ शकते ती शिवसेनाच आहे. मराठी शाळाच टिकल्या नाहीत तर मराठी संस्कृतीचे काय होणार हा प्रश्नच आहे. राज्याचे मराठीपणच टिकणार नसेल तर हे राज्य मराठी आहे असे म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे धर्माचे राजकारण सोडून भाषेच्या राजकारणाकडे शिवसेनेने वळण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीकारणाचा आजवर दुर्लक्षित राहिलेला मुद्दा पुन्हा हाती घेण्याची गरज आहे. शिवसेनेने हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिट्ठी देऊन मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या राजकारणाकडे वळायला हवे हे अनेक शिवसैनिकांना इतक्या वर्षांच्या सवयीनंतर रुचणार नाही. पण शिवसेनेच्या स्थापनेचा  इतिहास पाहिला तर तोच शिवसेनेसाठी स्वाभाविक कार्यादेश आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

शिवसेना राजकीय पक्ष म्हणून आज एका नवीन वळणावर उभी आहे. पारंपरिक मित्रपक्षाला सोडून काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षांशी महाआघाडी करून शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांआधी असे काही सत्तासमीकरण महाराष्ट्रात आकाराला येईल याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे आणि स्वतः मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे हे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी प्रथम - संपादकीय

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    शिवसेनेचे काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाणे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मानणार्या बहुसंख्य लोकांना आवडलेले नाही.येणारा काळच त्याचे उत्तर देईल. शिवसेनेने पुन्हा जोमाने मराठी भाषा व संस्कृतीच्या संवंर्धनासाठी प्रयत्न करावेत.

  2. Ganesh anant navgare

      5 वर्षांपूर्वी

    छान

  3. jgajanan

      5 वर्षांपूर्वी

    छान



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen