उन्हाळी सुट्टी म्हणजे भरपूर मोकळा वेळ. एरवी शाळा आणि अभ्यास या रुटीनमध्ये अनेक गोष्टी करायच्या राहून जातात ना! अगदी घरच्यांशी पोटभर गप्पा मारायलाही वेळ मिळत नसेल कधीकधी. सुट्टीत ही सगळी कमतरता भरून काढा. या काळात तुम्ही, तुमचे मित्रगण आणि तुम्हा सर्वांचे पालक मिळून काही गोष्टी गटाने करून बघा. या निसर्गरम्य ऋतूत आनंदाचा बहर अनुभवा. त्यासाठी हा खास लेख.. मुलांसह पालकांनी वाचावा असा! यातून तुम्हांला तुमच्या सुट्टीत आनंदाचा बहर अनुभवण्याच्या विविध कल्पना कळतील. आणखीही काही सुचतील! आणि तुमची सुट्टी अविस्मरणीय होईल. आमची मुले लहान असताना आम्ही काही समविचारी पालकांनी मिळून प्रत्येक सुट्टीत काही प्रयत्न केले होते. आपापल्या मुलाबद्दलसजगतेने विचार करून कुठल्या गोष्टी करायच्या हे आम्ही ठरवायचो. जमल्यास त्याचा एकत्र बसून चार्ट तयार करायचो. या सर्व गोष्टींमध्ये पालकांनी आवडीने सहभागी होणे अतिशय आवश्यक आहे. हे केल्याने मुलांचे आणि पालकांचे एकमेकांबरोबरचे नाते अधिक पोषक करता येते. सुट्टीत आजोळी किंवा नातेवाईकांकडे मुले एकत्र जमतात, तेव्हा काही खेळांमध्ये पालकांचा सहभाग असावा. त्यामुळे मुले-पालक नात्यात खेळकरपणा येऊन वयाचा अडसर (Generation gap) कमी होतो. आसपासची मुले सुट्टीत ठरवून एकत्र येणे, एकत्र राहणे असेही करू शकतात. सर्वांनी मिळून सुट्टीचा आनंद एकत्र घेण्याने पुढील आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर (अगदी ताणाच्या अवस्थेतही) आनंदाने कसे जगायचे, हे तुम्हा मुलांना समजते.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण , पालकत्व , बालसाहित्य
प्रतिक्रिया
उन्हाळी सुट्टी आणि आनंदाचा बहर
वयम्
स्वरूपा वकनाली
2019-04-12 10:10:19
वाचण्यासारखे अजून काही ...

एक अपूर्व प्रभात - पूर्वार्ध
काकासाहेब गाडगीळ | 2 दिवसांपूर्वी
सामान्यपणें राजकारणी पुरुष प्रसन्न असला तरी तो तसें दाखवित नाहीं.
कबजी कलुशा - भाग तिसरा
संजीव प. देसाई | 6 दिवसांपूर्वी
त्याची योग्यता लघु होती, पण आकांक्षा जबर होती.
कबजी कलुशा - भाग दुसरा
संजीव प. देसाई | 2 आठवड्या पूर्वी
राजकारणांतली कबजीची ही कामगिरी थोडी असली तरी प्रशंसनीय होती
कबजी कलुशा - भाग पहिला
संजीव प. देसाई | 2 आठवड्या पूर्वी
बक्षीसपत्रांस "संभाजीराजे यांस कृष्णाजी विश्वासराव यांचे सांभाळी केलें " असा उल्लेख आहे.
संपादकीय
अप्पा परचुरे | 3 आठवड्या पूर्वी
सन १९५९ साली 'स्वस्त पुस्तक योजना' योजून त्याप्रमाणे बारा पुस्तकें प्रसिद्ध केली.