वाचनसंस्कृती आणि शहामृग

पुनश्च    भानू काळे    2018-07-16 06:00:40   

अंक - अंतर्नाद -२०१२

दोन मोठ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वाचनसंस्कृतीवरचे दोन लेख परवाच एकापाठोपाठ एक वाचनात आले. आपली वाचनसंस्कृती आजही अगदी ठणठणीत आहे, लोक मराठी पुस्तके वाचत नाहीत ही ओरड खोटी आहे, शहरी भागात कदाचित वाचनाचे प्रमाण कमी झाले असेल पण ग्रामीण भागात आजही भरपूर पुस्तके खपतात आणि मुख्य म्हणजे ग्रामीण तरुणही मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचत असतो असा साधारण त्या लेखांचा आशय होता. या अतिशय आशावादी, 'फील-गुड' विवेचनाला आधारभूत होती ती चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्यसंमेलनात तीन कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली, ही सगळीकडे ठळकपणे प्रसृत झालेली बातमी. कोणीही तिचे खंडण केले नव्हते व त्यामुळे ती खरी असावी असेच बहुतेकांनी मानणे स्वाभाविकही होते. माझ्या मनात मात्र हा लेख वाचल्यावर काही प्रश्न निर्माण झाले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , चिंतन

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    लेखकाची भूमिका आणि निरीक्षण रास्त आहे . वाचना बदले खूप कमी लोकांना - संस्थांना आस्था आहे . मी माझ्या परिसरातील दोन तीन वाचनालये अशी पाहिली आहेत तिथे कोणतीही भरताड पुसाळे खरेदी करून ठेवतात कुणी हातही लावत नाही . ग्रंथ पाल जागेवर नाही . .

  2. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    लेख खरच विचार करायला लावणारा आहे. सध्या साधं रोजचं वर्तमानपत्र कितीजण पूर्णपणे वाचतात? अगदी आपल्यालाही इच्छा असूनही ते पूर्ण वाचणे बरेचदा गडबडीत शक्य होत नाही. मोबाईल चा वापर मात्र अतोनात वाढला आहे. व आता त्याला कोणताच इलाज नाही. ्

  3. किरण भिडे

      4 वर्षांपूर्वी

    धन्यवाद, श्रीपाद जी. सगळ्यांनी मिळून आपापल्या शक्तिस्थानानुसार काम केले तर हे सहज शक्य आहे. मात्र मराठी माणसाने त्यासाठी एकत्र आले पाहिजे...

  4. shripad

      4 वर्षांपूर्वी

    काळानुरूप बदल अपरिहार्य आहे. एका प्रतिक्रियेत आले आहे त्याप्रमाणे आताची तरुण मुले मोबाईल वर वाचतात. वाचत नाहीत असे तर नाही ना, त्यांचे वाचनाचे माध्यम फक्त बदलले आहे. प्रकाशकांनी, नियतकालिकांच्या संपादकांनी स्वरूप बदलले पाहिजे. वाचक आहेत, त्यांना ज्या स्वरूपात साहित्य हवे आहे ते आणि तसे आपण देणार का हा प्रश्न आहे. मला तर वाटते पुनश्च (आणि बहुविध) हे बदलत्या कालानुरूप उचललेले योग्य पाऊल आहे. याचे अनुकरण सगळ्यांनी केले पाहिजे.

  5. sakul

      6 वर्षांपूर्वी

    वाचन-संस्कृतीबद्दल अधूनमधून चर्चा होत असते. चर्चेचा लंबक कधी नकारात्मक टोकाला आणि कधी सकारात्मक टोकाला असतो. श्री. भानू काळे यांचा हा लेख वाचन-संस्कृतीबद्दल वास्तव काही सांगणारा (आणि त्याबद्दल काही नकारात्मक मांडणारा) असला, तरी तो पूर्णपणे एका बाजूला झुकलेला नाही. (कागदावर छापल्या जाणाऱ्या साहित्याचं) वाचन कमी झालं आहे, ही बाब अमान्य करण्यात हशील नाही. माझं स्वतःचं वाचनही गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्याची कारणं वेगवेगळी. पण त्याच बरोबर डिजिटल माध्यमात वाचणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे, असंही दिसतं. अनेक नियतकालिकं डिजिटल स्वरूपात दिसतात. त्यावर बरंच काही वाचण्यासारखं असतं. वृत्तपत्रांचे खपाचे आकडे दर वर्षी वाढताना दिसतात; त्याच बरोबर तरुण पिढी वृत्तपत्रं वाचत नाही, अशी तक्रारही. वर्तमानपत्रात मोठ्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने कार्यालयीन बैठकीत जाहीरपणे सांगितलं होतं की, माझ्या घरी रोज आठ-दहा वृत्तपत्रं येतात. पण मुलं एकही वृत्तपत्र उघडून पाहत नाहीत. त्यांना विचारलं की, ते मोबाईलकडे बोट दाखवून आम्ही याच्यावर वाचतो, असं सांगतात. यात बऱ्यापैकी तथ्य आहे. तिशीच्या आतल्या पिढीला मोठ्या पडद्याच्या मोबाईलवर वाचणं सोपं जातं. एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीवर फेसबुकसारख्या माध्यमातून हजार-दीड हजार प्रतिक्रिया आल्याचे दिसते. याचाच अर्थ वाचलं जातं. आता मुद्दा आहे तो ललित साहित्याच्या वाचनाचा. त्यात अलीकडच्या काळात नवीन काय वाचायला मिळतं, हा प्रश्नच आहे. अलीकडे दिवाळी अंकांतून दर वर्षी दोन-तीनसुद्धा नवीन चांगले लेखक पाहायला मिळत नाहीत. प्रतिष्ठित मासिकं-वार्षिकं 'प्रतिष्ठित' नावांवरच मदार ठेवून असतात. तुलनेने उपयोजित पुस्तकांची मागणी चांगली आहे. त्यामुळेच आमच्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक पुस्तक विक्रेता तब्बल साडेतीन-चार वर्षांपासून तळ ठोकून आहे. त्या प्रदर्शनाला मी अनेकदा वेगवेगळ्या वेळी गेलो. पण तिथे कधीही लक्षणीय गर्दी जाणवली नाही. पण पुस्तके विकली जातात, म्हणूनच तर तो विक्रेता तिथं बसला आहे ना? 'अवांतर वाचन' पूर्वी करमणूक, मनोरंजन यासाठी केलं जायचं, असं मला वाटतं. त्यात ज्ञान किंवा माहिती मिळविण्याचा उद्देश नव्हताच असं नाही; पण प्रमाण कमी आहे. गेल्या पाव शतकात मनोरंजनाची नवनवीन व अधिक सुटसुटीत साधनं उपलब्ध झाली आहेत. त्याचा हा परिणाम असावा. 'व्हॉट्सअॅप'नामक प्रकाराने चार-पाच वर्षांत 'खुळे करून सोडावे सकळ जन...' असंच काहीसं केलं आहे. साहित्य संमेलनात होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या बातम्यांची 'कोटीच्या उड्डाणाच्या' शीर्षकाच्या बातम्या म्हणजे 'ठोकून देतो ऐसा जे...' प्रकारातील असाव्यात, असं मानायला बराच वाव आहे. गर्दीचे आकडे छापण्याची पद्धत परभणीच्या संमेलनापासून आणि पुस्तककोटीचे आकडे देण्याची पद्धत नगरच्या संमेलनापासून सुरू झाली. श्री. भानू काळे यांना महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याकडून आलेला (किंवा अजिबातच न आलेला!) अनुभव विदारक आहे. वाचन-संस्कृती जोपासण्याची जबाबदार का कुणास ठाऊक, आपण पत्रकार-प्राध्यापक यांच्यावर टाकली आहे. वाचन-संस्कृतीला मारक ठरणारीच भूमिका या दोन्ही घटकांनी काही वर्षांत पत्करल्याचे दिसते.

  6. argaikwad

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख, खरे म्हणजे आधी देखील वाचक कमीच होते व अता देखील कमीच आहे, वाचक संख्या कधीच जास्त नव्हती.

  7. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    नमस्कार.पैसे कसे पाठवू ?

  8. VijayGokhale

      6 वर्षांपूर्वी

    खरेखुरे चिंतन. जाणकारानी उपाय सुचवावेत.

  9. VijayGokhale

      6 वर्षांपूर्वी

    खरेखुरे चिंतन.

  10. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    हिंदी लिपी वापरून लिहिताना काही अक्षरांमध्ये अडचण येते. बाकी उत्तम लिहिता येते. नाहीतर तुम्ही सरळ मिंग्लिश कीबोर्ड download करा. ते सगळ्यात सोपं. काही अडचण वाटली तर 9152255235 या नंबरवर whatsapp मेसेज करून विचारा.

  11. geetabarve

      6 वर्षांपूर्वी

    Lekhakachya matashi mi pan sahmat ahe.mi sulona sanskrit sthanam chi sabhasad ahe tyani vachnalay chalu kelay don Varsha purvi jyat khup durmil pustak granth ahet .pan anubhav hach koni firkat nahi.ya sarv pustakanch karaych Kay?mothach prashn ahe.srry mazya phone madhe Marathi typing nahi hindi ahe.tya mule ase dhedgujari lihave lagat ahe

  12. arush

      6 वर्षांपूर्वी

    एकंदरीत आजचा वाढलेले सुशिक्षितांचे प्रमाण पाहता व वाचकवर्गाचे वय पाहता परिस्थिती चिंताजनक आहेच. शहरी व ग्रामीण अशीही वर्गवारी पाहीली तर चिंताजनक आहे

  13. arush

      6 वर्षांपूर्वी

    लेख खूपच वास्तववादी आहे. वाचनसंस्कृती धोक्यात असल्याचा डांगोरा सतत पिटायची गरज नसली तरी धोका नाही असे म्हणणे हे स्वत:लाच फसवण्यासारखे आहे

  14. Achninad

      6 वर्षांपूर्वी

    माझे दोन मुद्दे. १. आता किंडल वर पण मराठी पुस्तकं येत आहेत. PDF तर आहेच. लोकं व्हॉटसअप आणि इतर समाज माध्यमांवर सुद्धा खूप मराठी लेख वाचतात. 2. Misalpav.com, maayboli.com अशा संकेतस्थळांवर खूप चांगले साहित्य प्रकाशित होते व त्याचा वाचकवर्ग मोठा आहे. म्हणजे पुस्तक वाचक इतर माध्यमांकडे वळलेत असं मला वाटतं.

  15. Meenal Ogale

      6 वर्षांपूर्वी

    वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होतो आहे हे खरेच आहे.मला असं वाटत कीं कुठल्याही काळीज वाचनवेडी माणसे कमीच होती.एकंदरीतच भाषाविषय ,साहित्य ह्याकडे कलं कमीच होता.वेगवान आयुष्य ,व्यवसायधंद्यातील स्पर्धा,यामुळे व नवीन माध्यमांच्या आकर्षणांमुळे ही आवड कमी होत असावी.मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे.हल्ली इंटरनेटचा वापर वाढला आहे.मराठी संकेतस्थळांवर खूप नवेनवे लेखक नवनवीन प्रकारचे विषय हाताळताना दिसतात.छायाचित्रे वगैरे वापरून केलेले हे लेखन दर्जेदार वाटते आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळताना दिसतो.घरबसल्या ह्याचा आनंद माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तिलाही घेतां येतो.फेसबुकसारख्या माध्यमाद्वारेही लेखन लोकांपर्यंत पोचते आहेच.मला असं वाटतं माध्माचाच फरक पडला असेल.

  16. Seemantini Lokhande

      6 वर्षांपूर्वी

    लेख वाचला, विचार करायला लावणारा नक्कीच आहे. कोणत्याही संस्काराप्रमाणे वाचनसंस्कारही बालवयातच झाला पाहिजे. ही जबाबदारी पालकांबरोबर गुरूजनांचीही आहे. Gyan-key वाचनालयाच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रातील ३,९१० ग्रामीण माध्यमीक (५वी ते १० वी अर्थात वय वर्ष १० ते १६) शाळांमध्ये वाचनालये सुरू झाली आहेत. याचा लाभ १० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होत आहे. त्यातील १,७५,००० विद्यार्थ्यांनी आम्हाला व १,५७,००० देणगीदारांना पुस्तके वाचल्याची अभिप्राय पत्रे पाठविली आहेत. ही पत्रे कोणतीही व्यक्ती आमच्या कार्यालयात पाहू शकते. मुले वाचत आहेत. लिहीत आहेत यातीलच काही मुले वाचक म्हणून घडणार आहेत. ही बाब सकारात्मक आहे असे आम्हाला वाटते. श्री. भानू काळेंनी पण ही पत्रे पाहिली आहेत त्यांनी या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. यांवर त्यांनी “न्युजवीकची अखेर आणि प्रदीप लोखंडे” हा लेख अंतर्नाद मासीकात लिहला आहे. सीमंतिनी लोखंडे

  17. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    www.punashcha.com/subscribe या लिंकवरून सभासद होता येते. काही अडचण आली तर ९१५२२५५२३५ या नंबरवर whatsapp संपर्क करा.

  18. सुधीर मोडक

      6 वर्षांपूर्वी

    वाचाल तर वाचाल असं प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलं होतं. आज कोणी वाचत नाही त्यामुळे भविष्यात आपण आणि मराठी भाषा वाचणं खरंच कठीण आहे. पुढच्या पिढीला ज्ञानेश्वर तुकाराम माहितही नसतील. असो. तुमचा उपक्रम अभिनंदनीय आहे. मी सभासद होऊ इच्छितो.

  19. maheshbapat63

      6 वर्षांपूर्वी

    वास्तव समस्या लेखातून दाखवली गेली आहे कुटुंबात होणारे संस्कार आणि शालेय वातावरण यातून उपाय होऊ शकतो।

  20. Aaidada

      6 वर्षांपूर्वी

    ही माझी खंत तर माझ्या घरापासून च सुरु होते. महाराष्ट्रा बाहेर राहते. मुलीला शाळेत हिंदी विषयामुळे मराठी अक्षर ओळख चांगली झाली पण तीची विचार करायची भाषा इंग्रजी आहे. आम्ही दोघांनी आमच्या परीने तीच्या वर पुष्कळ मराठी ची सक्ती केली. दोघेही महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी त होतो म्हणून नाटक,मराठी कार्यक्रम खूप पाहिले, भाग घेतला पण ते एका वयापर्यंत आता तर आईने सक्तीने पाठवलेल्या मराठी मेसेजेस ना इंग्रजी त उत्तर देणे ह्या पलिकडे मराठी तीच्या प्रांगणात ही नाही. लग्न मल्याळी मुलाशी केले त्याची अवस्था हीच्याहून वाईट कारण तो सातवी पासून कॉलेज पर्यंत परदेशात वास्तव्यास होता. सध्या माझ्या घरची संवादाची भाषा इंग्रजी झाली आहे. एकंदर असे दिसते आहे की भारतीय भाषांची स्थिती सारखीच

  21. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . आकडेवारीच्या जंजाळात न पडता वैयक्तिक पातळीवर शक्य तेवढे करत राहणे योग्य . मला वाटतं इथे ' पुनश्च ' सारखी योजना फार उत्तम ठरेल .

  22. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    अंतर्नाद बंद होणे ही आपल्यासारख्या शेकडो वाचकांची खंत आहे, यात शंका नाही.

  23. Mangesh Nabar

      6 वर्षांपूर्वी

    मला स्वतःला श्री. भानू काळे यांनी अंतर्नादसारखे मासिक का बंद करावे हे संपूर्णपणे पटलेले नाही. एक तर त्याच्या वर्गणीदारांची संख्या आजच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देखील समाधानकारक होती. शिवाय भानूराव काळे यांनी आता त्यांना वयोमानाप्रमाणे हे एकट्याने सांभाळणे जमत नसल्याचे एक कारण दिले. त्यांना अपेक्षित असा तरुण व उमद्या स्वभावाचा सहकारी कदाचित सापडला नसावा. आज मला प्रत्येक महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अंतर्नाद मासिकाची आठवण येत असते! दर आठवड्याचा मिळणारा 'साधना' साप्ताहिकाचा अंक ही माझी कित्येक वर्षांची सवय झाली आहे.

  24. Mangesh Nabar

      6 वर्षांपूर्वी

    क्षमा असावी मी आपल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देत आहे म्हणून. परंतु पुस्तक पी डी एफ मध्ये मिळणे आणि ते स्मार्ट फोनवर वाचणे हे मला, माझ्या उतारवयामुळे डोळ्यांना त्रास देणारे होत आहे असे आढळले. मात्र एखादे पुस्तक वाचताना किंवा संगणकावरील पडद्याचे वाचन करताना तसे झाले नाही. हा कदाचित माझ्या दृष्टीचा दोष असू शकेल. काहीही असो, वाचनसंस्कृती बिघडण्यास हल्लीची सुधारलेली प्रसार माध्यमे कारण आहेत हे तितकेच खरे. मंगेश नाबर

  25. asmitapatil

      6 वर्षांपूर्वी

    लेख वाचून वाईट वाटले. लहानपणी शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अधाशासारखी पुस्तके वाचली आहेत. आता परदेशात रहाताना माझ्या मुलाला मराठीची समृद्धी कशी बरे सांगू जेणेकरून तो सुद्धा मराठी भाषेच्या प्रेमात पडेल असा प्रश्न मला पडला होता. सुरवातीला मराठी आद्याक्षरांपासून सुरूवात केली. विविध विषयांवर मराठीत किती सुंदर लिखाण केले आहे ह्याची चर्चा घरात सुरू केली. आता माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे आणि जर्मन भाषेइतकाच मराठी भाषेच्या प्रेमात आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. आपण स्वतः आपल्या मुलांना भाषेचे भांडार एकदा उघडून दिले की भाषा टिकेलही आणि वृद्धींगत पण होईल असे मला वाटते.

  26. सुरेश जोहारी

      6 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्यासारखा वस्तुस्थितीला धरून असा लेख . खरोखरच मराठी भाषाप्रेमींना याचे अत्यंत दु:ख आहे.

  27. dhananjaynewadkar

      6 वर्षांपूर्वी

    योग्य मांडणी, यावर पुनश्च सारखे वेब पोर्टल अधिक रंजक करून ,वाचन संस्कृती वृद्धिंगत करता येईल

  28. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    होय हे 100 % खरे आहे एकूण लोकांचा वाचनाचा कल कमी झाला आहे, ह्याला mobile, tv, कॉम्पुटर ही खरी कारणं आहेत, येत्या काळात पुनश्च सारखी web portal जास्त वापरली जातील, मला स्वतःला सुद्धा जर पुस्तक PDF मध्ये मिळाली तर बरं वाटत, मोबाइल वर download करायची आणि निवांत वाचायची

  29. RAMCSHAS

      6 वर्षांपूर्वी

    Sunder atmachintan

  30. kamalakar keshav panchal

      6 वर्षांपूर्वी

    भानू काळे यांचा लेख वाचला, गेली अनेक वर्षे चाललेली मराठी अवहेलना, शिक्षणासाठी निवडले जाणारे इंग्रजी माध्यम त्यामुळे लोप होत जाणारी वाचन संस्कृती याचा पंचनामा त्यांनी सविस्तरपणे मांडलेला आहे.अन्तर्नाद सारखी दर्जेदार मराठी मासिके बंद करण्याची वेळ संपादकांवर यावी यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. समस्त मराठी भाषाप्रेमींना याचे अत्यंत दु:ख आहे. लेखात शेवटी म्हटल्याप्रमाणे आपली शहामृगी वृत्ती सोडणे आवश्यक आहे, त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमाचा विचार गंभीरपणे करणे महत्वाचे आहे, ह्या गोष्टी ज्यावेळी घडून येतील त्याचवेळी आशेचा किरण दिसू लागेल.

  31. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    परिस्थितीची यथार्थ जाणिव करुन दिली या लेखाने! पुनश्च, अंतर्नाद सारख्या उपक्रमांना सक्रिय सहभाग देऊन आपण आपल्या बाजूने सुरवात तर करू शकतो.

  32. परशुराम देशपांडे

      6 वर्षांपूर्वी

    वस्तुस्थिती आहे ही. पण पुस्तकं मेली तर आपण जिवंतपणी मरून जाऊ.

  33. vasant deshpande

      6 वर्षांपूर्वी

    अस्वस्थ करणारा आणि त्याचबरोबर विचार करायला लावणारा लेख पुनर्मुद्रित केल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर या मागची कारणे शोधणे महत्त्वाचे वाटते. मी शिक्षणक्षेत्रात काम केले असल्याने चटकन् लक्षात येणारी कारणे पुढील प्रमाणे आहेत- १. शिक्षणक्षेत्र विद्यार्थी तयार करण्याऐवजी परीक्षार्थी तयार करू लागल्याला काही दशके झाली आहेत. हे शिक्षणाच्या सर्वच पातळ्यांवर दिसून येते. २. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे तर निवडक पाच विषयांवर भर द्यायचा. मग वगळायचे काय तर भाषा. पूर्ण भाषा विषयच जिथे परिस्थिती विसंगत आणि क्षुद्र वाटू लागला तिथे वाचनकौशल्याकडे दुर्लक्ष झाले तर नवल काय? ३. या बाह्य कारणांबरोबरच शिक्षणक्षेेत्रांतर्गत कारणेही महत्त्वाची आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे प्राथमिक स्तरावरील भाषा शिकविण्याच्या चुकीच्या पद्धती. १९१९साली अहवाल देणा-या हर्टॉग कमिटीने सांगितले होते की या पद्धती बदलायला हव्यात. पण संस्था आणि शासकीय पातळ्यांवर प्रयत्न करूनही शिक्षक आणि त्यांचे पर्यवेक्षक परंपरागत पद्धती सोडायला तयार नाहीत. या पद्धतीमुळे वाचन फार संथ गतीने होतेआणि वाचनातला रस कमी होतो.म्हणूनच शाळा वा महाविद्यालयातील शिक्षण संपल्यावर अन्य पुस्तके वाचणारे अपवादानेच पाहावयास मिळतात. ४. मराठी कुणीही शिकवावी या समजुतीमुळे ज्यांना स्वतःला मराठीची आवड नाही असे अनेकजण पु,ल. देशपांडे गमतीने म्हणाले होते तसे मराठीबद्दल नावड निर्माण करण्याचे काम करीत असतात.

  34. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    नाबरसाहेब धन्यवाद. लेखाच्या शेवटी भटांच्या ओळी लिहिल्या आहेत,त्याच लक्षात ठेवायच्या. " करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, अजून आहेत झूंजणारे रणात काही " म्हणजे मग उपाय निघत राहतील. आणि तुम्ही स्वतः कृतीशील/प्रयत्नशील आहात, त्यामुळे तुम्हाला निराश होण्याची गरजच नाही.

  35. Sanjaymanisha

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान आणि अगदी स्पष्ट समीक्षण

  36. Mangesh Nabar

      6 वर्षांपूर्वी

    भानू काळे यांचा हा लेख प्रत्येक वाचनप्रिय माणसाला खिन्न करणारा आहे. आजचे वास्तव ते आपल्यासमोर मांडत आहेत. काय उपाय आहेत आपल्याजवळ? मंगेश नाबर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen