चित्रस्मृतीहोर्डींग्स नाका.....
सिनेमाचे जग म्हणजे केवढ्या तरी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यात असलेले/नसलेले/दडलेले अर्थ....गुलशन राॅय निर्मित आणि विजय आनंद दिग्दर्शित 'जाॅनी मेरा नाम ' ( १९७०) च्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून केलेली एक खेळी, गिरगावातील प्रार्थना समाज येथे या चित्रपटाच्या लागलेल्या होर्डींग्सवर पिस्तूलधारी देव आनंदला हेमा मालिनी बिलगून उभी होती. चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स यांची 'स्टोरी ' असावी असे सूचित होत होते आणि गोल्डीचा 'तिसरी मंझिल 'नंतरचा हा चित्रपट असल्याने तर त्याला पुष्टीच होती. पंधरा दिवसांनी तेथे 'जाॅनी... 'चे दुसरेच होर्डींग्स दिसले, आता देव आनंद, हेमा मालिनी, प्रेमनाथ, पद्मा खन्ना आणि प्राण यांचे फक्त चेहरे त्यावर होते....त्या काळात मुंबईत कुठेही गेल्यावर अशी महत्वाच्या काॅनर्सना हमखास होर्डींग्स दिसत. दादरच्या टिळक ब्रीजवरुन बेस्ट बसमधून जाताना दुतर्फा अशी भव्य होर्डींग्स दिसत. म्हणूनच तर त्या वयात 'खिडकीची जागा ' पटकावीशी वाटे. सात रस्त्याला बस आली रे आली की, न्यू शिरीन थिएटरला कोणता पिक्चर लागलाय यासह सभोवारची 'होर्डींग्सची जत्रा ' कधी बरे पाहतोय असं होई.आगामी चित्रपटाची प्रसिध्दी करण्याच्या अनेक माध्यमातील एक म्हणजे होर्डींग्स हे हळूहळू समजत गेले. आमच्या भवन्स काॅलेजला जाण्याच्या मार्गावर ऑपेरा हाऊस थिएटरचा भला मोठा काॅर्नर त्यासाठी खूप महत्वाचा. काॅलेजला येता जाता दोन गोष्टी क ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-09-24 08:59:24

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’