ऑर्वेलच्या भयस्वप्नातील लोकशाही


‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा लेखक जॉर्ज ऑर्वेल मृत्यू पावला, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याच्या कादंबऱ्यांमधून त्याने रेखाटलेले भविष्यातील मानवी समाजाविषयीचे भयस्वप्न आता वास्तवात उतरते आहे की काय, अशा भीतीने विचारी जगाला ग्रासले आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षांत ऑर्वेलची आठवण समकालीन लोकसंस्कृतीत पुन्हा एकदा जागती बनली आहे. देशोदेशीच्या अधिकारशहांनी लोकशाही मार्गातून ऑर्वेलच्या भयस्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरू केला असतानाच्या काळातील ऑर्वेलचे हे एक स्मरण.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२० , व्यक्तीविशेष , विश्ववेध
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Shriram Bhide

      3 वर्षांपूर्वी

    ऑर्वेल व हक्झले यांनी कल्पनाही केली नसेल अशी "सोशल मिडिया" नावाची एक अजिबात सोशिक नसलेली कधीकाळी मानवी असलेली ( म्हणजे आता अमानवी/ झालेली) एक जबरदस्त शक्ती उदयास आली आहे. तुम्ही मायाजालावर काय वाचावे, बघावे याचा ताबा कधीच व नकळतच या शक्तीला वापरणार्‍यांच्या हातात आपणच "I agree" असे बटण काहीएक न वाचता दाबून दिलेली आहे. त्यातूनच तुमचे विचार हवे तसे वळवायची मुभाच आपण त्यांना देऊ केलेली आहे. हे सुकाणु धरणारे आहेत कोण? पूर्वी कथांमध्ये "आपला एक हितचिंतक" असे पत्र लिहिणारा जसा कायमच अहित चिंतणाराच असायचा तसेच हे आहे. तुम्ही विशिष्ट प्रकारे विचार करणे तुमच्या (खरे तर त्यांच्या) हिताचे कसे आहे हे तुम्हाला ठसवून तुमची विचारप्रक्रियाच मुळी एका विविक्षित दिशेने नेणारे. मेँढपाळ..... खोलवर विचार जरी केला तरी देखील आपण सापळ्यात अडकल्याचे वास्तव समोर येऊन भय वाटते अन् मग पिंजर्‍यात अडकलेला उंदीर जसा आपण अडकल्याचे सत्य दृष्टीआड करून आमिषावर ताव मारीत राहतो त्यात अन् आपल्यात काही फरकच उरत नाहीये.

  2.   3 वर्षांपूर्वी

    शेवटच्या परिच्छेदातील पहिले वाक्य.. मात्र गेल्या पाच दहा वर्षात जेव्हा हे तुटपुंजे स्वप्नदेखील भंगले....... बापरे..भलतेच धाडसी विधान आहे.. दहा वर्षांपूर्वी थोडीशी (तरी)आशा होती ? आणि त्यानंतर असे काय महाभयंकर घडले की हे तुटपुंजे स्वप्नदेखील भंगले ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen