मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व वाङ्मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. कल्याण येथील साकेत महाविद्यालयातील श्रावण सोहळ्याचा हा वृत्तांत...साहित्य पाठवण्याचा पत्ताः [email protected]
मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
साकेत महाविद्यालयात रंगला श्रावण महोत्सव!
मराठी प्रथम
प्रा. प्रिया नेरलेकर
2019-09-13 15:00:04

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.