"शिकवून झाल्यावर मास्तर फुले चुरगळून फेकून देतात. त्यांनी दिलेले नीरस ज्ञान मुलांच्या पचनी पडत नाही. ती जांभया देऊ लागतात. 'कळलं आता नीट?' असा प्रश्न विचारून आणि मुलांना सर्व काही समजलयं, अशी स्वतःची समजूत काढून मास्तर निघून जातात. या संग्रहातील छोट्या - छोट्या कथांतून आपल्या शाळांमधले चेतनाहीन वर्गच जणू जिवंत झाले आहेत." आचार्य प्र. के. अत्रेे यांच्या समृद्ध बालसाहित्याचा क. जे. सोमय्या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकरांनी घेतलेला हा आढावा -
----------------------------------------------------------------
आचार्य अत्रे यांचे मला आवडलेले मुलांसाठीचे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘फुले आणि मुले’. हे पुस्तक जितके मुलांकरता आहे, त्याहीपेक्षा जास्त ते मोठ्यांकरता आहे. या पुस्तकात छोटया-छोटया गोष्टी आहेत. त्यातल्या सहा गोष्टी थेटपणे आपल्या शिक्षणव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
‘ठोकळ्याचे चित्र’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक वर्गात येतात. आणि ठोकळयाचे चित्र मुलांनी काढावे म्हणून टेबलावर एक ठोकळा ठेवतात. लहान मुलांना अनेकदा ‘अमुकच चित्र काढ’ असे म्हटलेले आवडत नाही. त्यांना स्वतःच्या मनाने, मर्जीनुसार चित्रं काढायची नि रंगवायची असतात, मात्र ‘गुरुजी, फूल काढू का?’ असे म्हणणाऱ्या एका बारकुळया मुलाची वर्गात फजिती होते. इतक्यात वर्गातल्या दत्तू सानेची तक्रार एक मुलगा करतो.
हेही वाचा - हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग तीन)
मराठी प्रथम
डॉ. वीणा सानेकर
2020-06-08 10:00:50

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीशासन, शिक्षक, पालक असं सगळ्या समाजाचंच अपयश म्हणावं लागेल.
dabhay
5 वर्षांपूर्वीएवढे आधीपासून शिक्षण पद्धतीत अजून बदल नाही हे कोणाचे अपयश?
nehasawant
6 वर्षांपूर्वीखूपच सुंदर लेख, संस्कार मूल्यांची जाणीव करून देणारा.
vranjita
6 वर्षांपूर्वीआपल्या शालेय व्यवस्थेविषयी डोळ्यात अंजन घालणारा लेख.
pvanashri
6 वर्षांपूर्वीसहज आणि सुटसुटीत मांडणी. छान.
6 वर्षांपूर्वी
ओघवत्या शैलीत मस्त आढावा