"शिकवून झाल्यावर मास्तर फुले चुरगळून फेकून देतात. त्यांनी दिलेले नीरस ज्ञान मुलांच्या पचनी पडत नाही. ती जांभया देऊ लागतात. 'कळलं आता नीट?' असा प्रश्न विचारून आणि मुलांना सर्व काही समजलयं, अशी स्वतःची समजूत काढून मास्तर निघून जातात. या संग्रहातील छोट्या - छोट्या कथांतून आपल्या शाळांमधले चेतनाहीन वर्गच जणू जिवंत झाले आहेत." आचार्य प्र. के. अत्रेे यांच्या समृद्ध बालसाहित्याचा क. जे. सोमय्या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकरांनी घेतलेला हा आढावा -
----------------------------------------------------------------
आचार्य अत्रे यांचे मला आवडलेले मुलांसाठीचे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘फुले आणि मुले’. हे पुस्तक जितके मुलांकरता आहे, त्याहीपेक्षा जास्त ते मोठ्यांकरता आहे. या पुस्तकात छोटया-छोटया गोष्टी आहेत. त्यातल्या सहा गोष्टी थेटपणे आपल्या शिक्षणव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
‘ठोकळ्याचे चित्र’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक वर्गात येतात. आणि ठोकळयाचे चित्र मुलांनी काढावे म्हणून टेबलावर एक ठोकळा ठेवतात. लहान मुलांना अनेकदा ‘अमुकच चित्र काढ’ असे म्हटलेले आवडत नाही. त्यांना स्वतःच्या मनाने, मर्जीनुसार चित्रं काढायची नि रंगवायची असतात, मात्र ‘गुरुजी, फूल काढू का?’ असे म्हणणाऱ्या एका बारकुळया मुलाची वर्गात फजिती होते. इतक्यात वर्गातल्या दत्तू सानेची तक्रार एक मुलगा करतो.
हेही वाचा - हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग तीन)
मराठी प्रथम
डॉ. वीणा सानेकर
2020-06-08 10:00:50

वाचण्यासारखे अजून काही ...

लता मंगेशकर - उत्तरार्ध
शांताराम खळे | 5 दिवसांपूर्वी
'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !'
लता मंगेशकर - पूर्वार्ध
शांताराम खळे | 2 आठवड्या पूर्वी
माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं
कथा : आयुष्याचा हिशोब
व. पु. काळे | 2 आठवड्या पूर्वी
एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते!
म. गांधी समाजवादी होते काय ?
राम जोशी | 2 आठवड्या पूर्वी
सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे.
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीशासन, शिक्षक, पालक असं सगळ्या समाजाचंच अपयश म्हणावं लागेल.
dabhay
5 वर्षांपूर्वीएवढे आधीपासून शिक्षण पद्धतीत अजून बदल नाही हे कोणाचे अपयश?
nehasawant
5 वर्षांपूर्वीखूपच सुंदर लेख, संस्कार मूल्यांची जाणीव करून देणारा.
vranjita
5 वर्षांपूर्वीआपल्या शालेय व्यवस्थेविषयी डोळ्यात अंजन घालणारा लेख.
pvanashri
5 वर्षांपूर्वीसहज आणि सुटसुटीत मांडणी. छान.
5 वर्षांपूर्वी
ओघवत्या शैलीत मस्त आढावा