आपले वाङ्‌मय- पन्नास वर्षे झाली तरी, तेच ते...

पुनश्च    बाळ सामंत     2019-10-05 06:00:32   

कवी लिहितो तेव्हा त्याला कालचे, आजचे आणि उद्याचे सगळेच स्पष्ट दिसत असते. त्यामुळेच बहुधा विंदा करंदीकर लिहून गेले असावेत- सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!  माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन  तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... दिवंगत  ज्येष्ठ  लेखक बाळ सामंत यांचा प्रस्तुत लेख वाचताना आपल्या ओठी ही कविता आपसूकच येते. लेख आहे तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचा.  त्यात मराठी समाज, मराठी वाचन संस्कृती, साहित्यिकांचे समाजातले हरवत चाललेले स्थान, व्यासंग-पांडित्य याबाबत वाढत असलेली समाजाची उदासीनता अशा सांस्कृतिक स्खलनाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.  पन्नास वर्षांपूर्वीच्या या लेखात, तीस वर्षांपूर्वीच्या एका विधानाचा (म्हणजे आजपासून ८० वर्षांपूर्वीच्या) हवाला देण्यात आलेला आहे. आज हा लेख वाचताना आपण जर आजची स्थिती पाहिली तर सामंतांनी व्यक्त केलेल्या काळजीला शंभराने गुणावे लागेल  आणि पुन्हा म्हणावे लागेल तेच ते आणि तेच ते! परंतु या स्थितीतही मराठीत शिल्लक आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा हात धरून ‘बहुविध’ डिजिटल मल्टिमिडियाचे  प्रयत्न सुरु आहेत, याची सदस्यांना जाणीव असेलच. ललित मासिकाच्या १९६९ सालच्या अंकातील हा लेख या महिन्याच्या 'चिंतन' या सदरात देत आहोत. बाळ सामंत (२७ मे १९२४- १८ जानेवारी २००९) हे हरहुन्नरी लेखक होते. इंग्रजी साहित्याचा त्यांचा प्रगाढ अभ्यास होता.  मराठी नाटक, नाट्यसंगीत  यापासून तर थेट जगातील प्रणयाची विभिन्न अं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , समाजकारण , ललित , भाषा

प्रतिक्रिया

  1. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    असं काही वाटत नाही . मागील पन्नास वर्षात मराठीत चांगले साहित्य लिहिले गेले असेलच . आमच्या पिढीने तेच वाचले .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen