लग्नाच्या विविध पद्धती


लग्न करणे हा जीवनांतील मुख्य व्यवहार होय आणि आपल्या जवळ जी साधी साधनें असतील त्यांनी हा समारंभ उरकून घेतात. पाश्चात्य देशांत नारिंगाची फुले शकुनाची समजतात आणि ती उधळल्याने ‘नवरा-बायको दोन्ही सुखी होवोत, नशीबवान होवोत आणि त्यास पुष्कळ संपत्ती मिळो’ असे दर्शवितात. गुलाबाची फुले देणे विशेषतः तांबड्या गुलाबाची हे एक प्रतीचे, आनंदाचे व सौंदर्याचे साधन समजले जाते. गव्हाच्या ओंब्यांची माळ गळ्यांत घालणे हेही भावी पुत्र-पौत्रादी सुखाचे चिन्ह होय. तांदूळ उधळण्याची पद्धत सर्वकडे आढळते. पतीबरोबर पत्नी दूरच्या प्रवासास निघाली म्हणजे त्यांच्यावर तांदूळ उधळणे अथवा दुसरे कुठले धान्य उधळणे हे शकुनाचे समजत. फळे, बदाम, सुपाऱ्या यांचाही उपयोग असाच करतात. कालिदासाने अशा एक लग्न-समारंभाचे वर्णन केले आहे. राजपुत्र ‘अजा’ व त्याची बायको ही सोन्याच्या सिंहासनावर बसली असतांना त्यांच्यावर ब्राह्मणांनी, नंतर खुद्द राजाने, नंतर सरदार व सरदारणी ह्यांनी धान्य उधळल्याचे वर्णन केले आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण
ज्ञान रंजन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen