कबजीचें हे वाढत जाणारे प्राबल्य शिरक्यांसारख्या मंडळींस सहन झालें नाहीं. इ. स. १६८५ आणि पुढील दोन अडीच वर्षे कबजी आपला आयुष्यक्रम कधी पन्हाळा तर कधी संगमेश्वरीं घालवित होता. पण या कालावधीतच शिर्के व कबजीबाबा यांच्यांत वांकडेपण आले. 'मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरी'त या घटनेसंबंधी बखरकार म्हणतो शिरके याणी विचार केला कीं, या कलशाने राज्यास बुडविले. यासि नेऊन मारावे, म्हणोन पंचवीस हजार इसम मिळविले, हे वर्तमान कान्हेरपंत कबजीकडील कारभारी याणी कबजीस श्रुत केले. त्याने महाराजांस लिहून शिरके यांजवर हल्ला करविला. लोक बहुत मारिले, त्यावर पिलाजी खिजमतगार व गणूजी शिरके मोगलाईत गेलें ! हा प्रसंग १६८८ तला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .