अरुण खोपकर यांची मुलाखत /चित्रस्मृती


चित्रपट दिग्दर्शक, अभ्यासक श्री.अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांची प्रा. अभिजीत देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत... प्रश्न: “चित्रव्यूह” आणि “चलतचित्रव्यूह” ही जुळी पुस्तकं अनेक अर्थांनी महत्वाची आहेत.तो एकीकडे तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा दस्तऐवज आहे,तर दुसरीकडे काळाचा मोठा पट त्यातून उलगडतो,अनेक कलाप्रवाहांच्या गेल्या चार-पाच दशकांतल्या बदलत्या रुपाचं ते आरेखनही आहे.या पुस्तकांच्या निर्मितीप्रक्रियेविषयी काय सांगाल ? खोपकर : आपण लेखक व्हावं किंवा नियमित लिहीत रहावं असं मला कधी वाटलं नव्हतं.गुरुदत्तवरचं पुस्तक काहीसं अपघातानंच लिहीलं गेलं.गुरुदत्तचे सिनेमे पाहिल्यावर मला त्यात काही सूत्रं जाणवली होती,त्यांची टिपणंही काढली होती.असं टिपण म्हणून लिहायला सुरुवात केल्यावर मला जे जाणवलं होतं ते पुरेसं व्यक्त होईपर्यंत मी लिहीत राहिलो.त्याचं पुढे “गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका “ हे छोटं पुस्तक झालं.त्यानंतर झालेलं लेखन हे वेळोवेळी चर्चासत्र किंवा चित्रपट महोत्सवांतून वाचलेले पेपर्स किंवा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून केलेलं लेखन या स्वरुपाचं होतं.त्यानंतर “रुपवाणी “ मासिकासाठी मी “चौकटीच्या आतबाहेर “ ही चित्रपट आस्वादाविषयी लेखमाला लिहीली.त्याच काळात लोकवाङमयगृहात बऱ्याचदा जाणं व्हायचं.तेव्हा मित्रांशी गप्पा व्हायच्या.त्यातून जयप्रकाश सावंत म्हणाला की,तुमच्याकडे इतकं सांगण्यासारखं आहे,ते लिहीलंत तर लोकांना वाचायला  नक्की आवडेल.तेव्हा मग “आपले वाङमयवृत्त “ या मासिकासाठी “आजोबांची बंडी “ सारखे काही लेख लिहीले.पण अर्थात त्यालाही मासिकाची शब्दमर्यादा होतीच.हे लिहीतांना मला लोकांचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen