ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडले.कोर्ट
सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट मध्ये केला गेलाय, यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकानी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडलेत. ‘कोर्ट’ला रुढार्थाने कथा नाही. पण जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात, यातील काही प्रमुख पात्र मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलिकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश्यप्रतिमातून दिग्दर्शक केवळ भारतीय न्याय व्यवस्थेचं अस्सल स्वरुपच दाखवीत नाही तर त्याचा अविभाज्य भाग असणा-या व त्यात अभावितपणे गुंतलेल्या माणसांच्या रोजच्या व्यवहाराचं व मानसिकतेचा वेध घेतो. त्यांच्या व्यवसाया व्यतिरिक्त असलेल्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक स्तराचं दर्शनही घडवतो.हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. -->
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
कोर्ट
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-05-12 10:00:30

वाचण्यासारखे अजून काही ...

अंजनवेलचं दीपगृह
प्रा. सुहास बारटक्के | 2 दिवसांपूर्वी
इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.
छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास
शं.गो.चट्टे | 4 दिवसांपूर्वी
आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
कलाकार प्राणी
सुबोध जावडेकर | 5 दिवसांपूर्वी
तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं.
शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१)
साधना गोरे | 6 दिवसांपूर्वी
मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावा
श्री. पु. आणि राम पटवर्धन
अनंत देशमुख | 7 दिवसांपूर्वी
राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच.
नव्याजुन्यांचा कलह
प्रो. गोविंद चिमणाजी भाटे | 7 दिवसांपूर्वी
आपल्या मराठेशाईंत इतके मुत्सद्दी व धोरणी पुरुष झाले, पण त्यांच्या भरभराटीच्या काळांत सुद्धा या इंग्रजांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती निरीक्षण करण्याचे कोणाच्याही कसे मनांत आले नाही?
bookworm
2 वर्षांपूर्वीकोर्ट मी बघितला आणि विदारक वास्तव बघून वेगवेगळ्या नकारात्मक भावना अनुभवल्या. ह्या अनुभवातून प्रत्यक्ष गेलेल्यांची हालत काय होत असेल? भारत सोडून लोक दुसर्या देशांत स्थायिक होण्याचे हेही एक कारण असेल का?