चित्रस्मृती/ अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस......


अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस...... चित्रपट कलाकारांनी राजकारणात यशस्वी व्हावे, इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत विजयी होणे हे आता नवीन राहिलेय नाही. यावेळी तर हेमा मालिनी, सनी देवल, मनोज तिवारी, किरण खेर, बाबुल सुप्रियो, स्मृती ईराणी, रविकिशन, अमोल कोल्हे,नवनीत राणा, हंसराज हंस, नूसरत जहां, मिमी चक्रवर्ती, देव ( दीपक अधिकारी) ,सुमालता ( कन्नड अभिनेत्री) असे चक्क चौदा फिल्मवाले देशातील विविध भागात आणि विविध राजकीय पक्षांतून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. पण जेव्हा महानायक अमिताभ बच्चन निवडणूकीत विजयी झाला आणि त्याने लोकसभेत पहिले पाऊल टाकले तेव्हा.... आपले फिल्मी करियर अतिशय उत्तम चालले असतानाच आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करणे या हेतूने अमिताभने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील इलाहाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्यासारख्या अतिशय कसलेल्या, मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय नेत्याविरुध्द उमेदवारी स्वीकारली आणि अख्खी चित्रपटसृष्टी, मिडिया आणि फिल्म दीवाने आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत सत्तेच्या राजकारणात दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सहभागी होतात आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ कलाकारांची राज्यसभेचे खासदार म्हणून स्वीकारले जातात ( उदाहरण म्हणजे पृथ्वीराज कपूर, नर्गिस) असा सर्वसामान्य समज होता. पण अमिताभ, वैजयंतीमाला आणि सुनील दत असे एकाच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार खासदार हे नवीन वळण आले. प्रत्येक निवडणुकीत 'नवा खासदार ' हे खास वैशिष्ट्य असते. किमान वीस टक्के खासदार नवीन असतात. त्यातील काहींच्या बाबतीत विशेष कुतूहल असते. त्यावेळी अमिताभबद्दल तसेच कुतूहल होते. आणि त् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen