नोबेल विजेत्या स्वेटलाना अलेक्सीविच यांनी लिहिलेल्या "व्होईसेस फ्रॉम चेर्नोबिल" या पुस्तकावर आधारित ही मालिका जॉन रेंक यांनी अशा पद्धतीने दिग्दर्शित केली आहे की आपण त्या सत्याच्या शोधाचा एक भाग बनून जातो......क्षणभर वाटते कि आपण सत्यघटना बघत आहोत.
चेर्नोबिल – एक दडपलेले वास्तव
✍ सुहास किर्लोस्कर
जगभरात अनेक भीषण घटना घडत असतात, ज्यामधून अगणित लोकांचे मृत्यू होतात, अनेक लोक जखमी होतात. काही घटनांचे परिणाम दुरोगामी असतात ज्याच्या झळा अनेक पिढ्याना सोसाव्या लागतात. आपल्याकडची भोपाळ दुर्घटना असो वा रशियामध्ये झालेला चेर्नोबिल स्फोट. माणसांचा हलगर्जीपणा बऱ्याच वेळेस कारणीभूत ठरतो. अशा दुर्घटना घडण्याआधी आपल्याला पूर्वसूचना मिळत असते पण माणूस या नात्याने आपण दुर्लक्ष करतो आणि शेकडो, हजारो जीव हकनाक मरतात. अगदी अलीकडे संरक्षक भिंतीखाली काही जीव गेले तर धरण फुटल्यावर काही कुटुंबे उध्वस्त झाली. याला जबाबदार कोण? खेकडे? प्रत्येक दुर्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमली जाते आणि पाच सहा महिन्यानंतर हितसंबंध जपत निष्कर्ष काढले जातात. Public memory is short. याचा फायदा यंत्रणा घेते. शिवाय दुर्घटना झाल्यावर मृतांचा आकडा नेहमीच खोटा सांगितला जातो. हे निर्विवाद सत्य आपणा सर्वाना माहित आहे आणि त्याबद्दल आपण बातमी वाचण्यापलीकडे काहीही करत नाही.
krmrkr
6 वर्षांपूर्वीमी नुकतीच ही सिरीज पाहिली. त्या दिग्दर्शकाचे,अभिनेते , अभिनेत्रींचे कौतूक करण्यास शब्द अपूरे आहेत. पाचही भाग पाहून झाल्यायावर त्या रात्री झोप येत नाही.या स्वरूपाचा भारतातला अपघात भोपाळ गॕस दुर्घटना.आज नाही उद्या कोणीतरी त्याचेही विश्लेषण करणारी सिरीज रिलीज करतील. अशी वेबसिरीज बनवल्या बद्दल HBO अभिनंदनास पात्र आहे.
mukundmk
6 वर्षांपूर्वीसध्या लोकसत्ता रविवार पुरवणी लोकरंगमध्ये चालू असलेली मेधा पाटकर लिखित लेखमाला आठवली.