चित्रस्मृती


चित्रस्मृती 

सिनेमा रखडला, नो प्रॉब्लेम!

सिनेमाच्या जगात हमखास यशाची कोणतीही फूटपट्टी/थर्मामीटर/तराजू/कॅम्प्युटर नाही, हा खूपच मोठा 'रिअॅलिटी शो ' आहे.... एकादा चित्रपट काहीना काही कारणास्तव निर्मितीवस्थेत फारच रखडतो, त्याच्या खाणाखुणा अगोदर पोस्टरवर दिसतात, मग पडद्यावरही तेच दिसू लागते, तरीही तो चित्रपट प्रचंड नसले तरी चक्क चांगले यश मिळवतो.... सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या नवलकथा अशा अनेक, त्या काळात स्टारच्या भारी क्रेझवर असे अनेक चित्रपट 'हाऊसफुल्ल गर्दी 'त पाहिले जात. पडदाभर आपला आवडता हीरो आहे एवढं एकच कारण अख्खा सिनेमा पाहण्यासाठी पुरेसे ठरे. राजेश खन्ना त्याचा मोठा लाभार्थी, तर अमिताभ बच्चन त्याहीपेक्षा मोठा फायद्याचा! म्हणूनच तर देवेन वर्मा दिग्दर्शित 'बेशरम ' ( रिलीज  एप्रिल १९७८) केवळ आणि केवळ अमिताभ बच्चनची रुपेरी अदाकारी पाहण्यासाठी पब्लिक आतूर होते. देवेन वर्मा म्हणजे बुध्दिवादी विनोदी अभिनेता म्हणून ओळखला गेला ( तत्पूर्वी तो व्हीलनगिरी करायचा) , निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने 'दाना पानी ' ( त्याच्याच एका चित्रपटाचे नाव) पातळीवरचे चित्रपट घडवले. ( का बरे?) 'बेशरम 'चा मुहूर्त 'दीवार ' ( रिलीज २४ जानेवारी १९७५) च्या यशानंतर अमिताभवर एक दृश्य चित्रीत करुन  झाला आणि 'शोले'( १५ ऑगस्ट १९७५) च्या यशानंतर त्यात अमजद खान आला. दरम्यान, शर्मिला टागोर ( अमिताभची प्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      4 वर्षांपूर्वी

    इतरांच्या हिट पेक्षा अमिताभचे फ्लॉप जास्त पाहिले जात. पटलं आणि आवडलं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen