चित्रस्मृतीयशराजची यशस्वी पन्नाशी आणि पुढे....
चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत/इतिहासात 'चित्रपट निर्मिती संस्था ' महत्वाचा घटक. फाळके फिल्म ते अगदी आजच्या धर्मा प्राॅडक्सन्सपर्यंत अनेक निर्मिती संस्थाचा महत्वाचा सहभाग आहे. हिंदी चित्रपटावर फोकस टाकताना सांगायचे तर, अगदी सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म, न्यू थिएटर्स, बाॅम्बे टाॅकीज यांनी विलक्षण ठसा उमटवला. राजकमल, आर. के. फिल्म, बिमल रॉय प्राॅडक्सन्स, नवकेतन, बी. आर. फिल्म, गुरुदत्त फिल्म..... एक मोठाच प्रवास सुरु आहे. कालांतराने अशा निर्मिती संस्थाची संख्या कमी झाली, स्वतंत्रपणे निर्मिती करणारे निर्माते वाढले वगैरे वगैरेया बदलत्या काळामध्ये एका निर्मिती संस्थेची नवीन माध्यमांसह बदलत वाटचाल सुरु आहे. ती म्हणजे यशराज फिल्म! त्याचे पन्नासावे वर्ष सुरु आहे....आपले ज्येष्ठ बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरखाली 'धूल का फूल ' ( १९५९) पासून आपल्या दिग्दर्शन वाटचालीला सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी 'धरमपुत्र ' ( ६१) नंतर 'वक्त ' ( ६७) या मल्टी स्टार कास्ट चित्रपटानंतर गीतविरहित 'इत्तेफाक ' ( ६९) आणि 'आदमी और इन्सान ' ( ६९) या चित्रपटानंतर निर्माता म्हणून स्वतंत्रपणे उभे राह्यचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत यशराज फिल्मच्या कार्यालयासाठी जागा दिली. १९७० ची ही गोष्ट! पहिलाच चित्रपट 'दाग ' ( रिलीज ७३) चा दिलीपकुमारच्या शुभ हस्ते मुहूर्त केला. ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-09-30 21:39:44

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’
Mannishalohokare
4 महिन्यांपूर्वी???