सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी तरुण चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली आहे . नारायण अंधारे यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा घेतलेला आस्वाद...सत्यजित राय यांची ओळख शाळेत असताना सामान्य ज्ञानाच्या प्रश्नामुळे झाली. ऑस्कर पुरस्कार मिळवलेले एकमेव भारतीय दिग्दर्शक कोण ? असा तो प्रश्न होता. त्यांचा सिनेमा कोणता ? हा दुसरा प्रश्न. याचं पथेर पांचाली हे उत्तर पाठ झालं होतं. हा पुरस्कार पथेर पांचालीसाठी मिळाला नसून त्यांचा जीवनगौरव करण्यासाठी त्यांना ऑनररी ऑस्कर मिळालाय हे मात्र माहीत नव्हतं.पथेर पांचाली म्हणजे एखाद्या दगडाची गोष्ट असावी असा अंदाज तेव्हा केला होता. दूरदर्शनवर जेव्हा पाहण्यात आला तेव्हा हे काहीतरी वेगळंच आणि बोअरिंग आहे असं वाटलं होतं. याच दरम्यान शतरंज के खिलाडीही पाहण्यात आला होता. तोही भयंकर बोअर निघाला. तो काळ बॉलिवूडचे मसालापट पाहण्याचा होता. दर शुक्रवारी रिलीज होणारा हिंदी सिनेमा आमच्यासाठी सिनेमाविश्व होतं.कधीतरी हॉलीवूडचे व्यावसायिक सिनेमे पाहणं हाच काय तो बदल. रिजनल सिनेमा काय, वर्ल्ड सिनेमा काय असतं हे तेव्हा गावीही नव्हतं. यामुळे पथेर पांचाली आणिशतरंज के खिलाडी हे दोन्ही सिनेमे दुर्लक्षिले गेले. 2011 च्या सुरुवातीला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पाहण्यात आल्यानंतर माझ्यासाठी वर्ल्ड सिनेमा आणि रिजनल सिनेमाची दारं उघडली. त्यानंतर पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चकरा वाढल्या. याच दरम्यान सत्यजित राय यांच्या सिनेमाची नव्याने ओळख झाली. त्यांच्या ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
समृद्ध होण्याचा काळ
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-10-04 23:36:49

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’