लेखक महेंद्र तेरेदेसाई यांनी एक ‘सायकॉलिजीकल थ्रीलर’ म्हणून या चित्रपटाची चांगली मांडणी केली आहे. पूर्वार्धात तर त्यांच्यातील लेखक-दिग्दर्शक चांगलाच खुलला आहे. वेलणकराचं सत्शील व्यक्तिमत्त्व आणि एका छायाचित्राच्या निमित्तानं त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला आव्हान देणारे प्रसंग पूर्वार्धात खूपच छान पद्धतीनं येतात. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतो.
मराठी चित्रपटसृष्टीच्या अलीकडच्या काळातील बदलांचं सर्वाधिक क्रेडिट ‘श्वास’ चित्रपटाला दिलं जात असलं तरी त्यापाठोपाठ लगेचच आलेल्या काही चित्रपटांचंही तेवढंच मोलाचं योगदान होतं. त्यापैकी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे २००५ मधील ‘डोंबिवली फास्ट’. या चित्रपटानं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला होता. या चित्रपटाचा शेवट ज्या पद्धतीनं झाला होता, तो पाहता त्याच्या ‘सिक्वेल’ला कुठेच जागा नव्हती. त्यामुळेच ‘डोंबिवली रीटर्न’ची घोषणा झाल्यानंतर जी गोष्ट संपली होती, ती पुढं कशी जाणार? याबद्दल सर्वांनाच कुतूहल होतं. २०१४ मध्ये खरं तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. तो मुळात हिंदी-मराठीत बनला. त्यानंतर काही कारणांनी रखडला आणि आता मराठीत तो प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा नायक जरी नागपूरच्या बाजूचा असला तरी चित्रपटामधील काही हिंदी संवाद कानी पडल्यानंतर या चित्रपटाचं ‘द्वैभाषिक’ कनेक्शन सहज लक्षात येतं. चित्रपटाच्या शीर्षकामधील ‘डोंबिवली’ शब्द आणि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संदीप कुलकर्णी या दोन गोष्टींचा अपवाद वगळल्यास ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘डोंबिवली रीटर्न’ या दोन चित्रपटांमध्ये तसं काहीच साम्य नाही.हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. -->
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
डोंबिवली रिटर्न/ कुंबलांगी नाईट्स्
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-02-24 06:00:37

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’