इथे-तिथे


अंक - ललित, एप्रिल-मे- जून २०२० कायम स्मरण है और भी दुनियामें सुखनवर बहुत अच्छे कहते है कि गालिब का है अंदाज-ए-बयाँ और असं खुद्द स्वतःबद्दलच गालिबनं म्हटलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही त्याने केलेली आत्मस्तुती न वाटता वस्तुस्थिती ठरली हे महद् आश्चर्यच म्हटलं पाहिजे. याबाबत मतभेद नाहीत. त्यामुळेच गालिबला जाऊन दीडशे वर्षे झाली (मृत्यू : १५ फेब्रुवारी १८६९, जन्म २७ : डिसेंबर १७९६ ) तरी त्याची शायरी ज्याला तेजतर्रार म्हणतात अशी आजही ताजीतवानी वाटते-वाटत राहील. गालिब सर्वकालिक ठरतो तो ह्या विशेषामुळे! आत्मविश्वास उर्दू शायरीचं एक बघितलं, अनेकदा न कळताच त्याला दाद मिळते. वाहवाऽऽ मिळायला काही अट लागत नाही... अशा वेळी अस्सल अभिजात लिहिणार्‍या गालिबला दाद न मिळाल्यासच आश्चर्य वाटेल. त्यामुळेच स्वतःबद्दल सार्थ आत्मविश्वास व्यक्त करतानाच तो म्हणतो. हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है वो हर इक बातपे कहना के यूँ होता तो क्या होता त्यामुळेच ‘जो वरी आहे स्मरण त्याला कसले आलंय मरण’ म्हटलं जातं ते हे असं... पण ह्या स्मरणाच्यापण तर्‍हा आणि तर्‍हेवाईकपणा असू शकतो. म्हणजे पहा गालिबची जन्मशताब्दी मोठ्या धुमधडाक्याने आणि सरकारी पातळीवरून सुद्धा साजरी झाली. तेव्हा वाटलं, गालिबची २५, ७५ अशी वर्षे का साजरी झाली नाहीत? स्मरण-विस्मरण मग गालिबच्या १५० व्या जयंतीची किती जणांना आठवण राहिली असेल? इथे मराठीचिये नगरीत मात्र असं सर्वप्रथम स्मरण ध्वनिमुद्रिकातज्ज्ञ आणि रसिले आस्वादक सुरेश चांदवणकर आणि भालचंद्र मेहेर यांनी पडद्यावरचा गाल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      4 वर्षांपूर्वी

    छान. दुर्मिळ पण मौल्यवान माहिती. आवश्यक त्या त्या ठिकाणी ती वेळेवर च नोंदवावी.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen