"या सगळ्यामुळे एक पद्धत म्हणून आम्हाला जन्माला आल्यापासूनच आमच्या भाषेचा बिगरप्रेम अभिमान होता. तिची उपयुक्तता कळण्याइतकी दूरदृष्टी त्या वयात विकसित झालेली नसल्याने लवकरच आम्हाला ह्या प्रेमहीन उद्योगाचा कंटाळा यायला लागला. मग भाषा म्हणजे कटकट वाटायला लागली. तिच्या नियमांची कटकट, व्याकरणाची कटकट, शब्दांच्या अर्थाची कटकट, त्या अर्थाच्या छटांची कटकट, उच्चारांची कटकट! एकूणच, शब्दांच्या भाषेचा व्यवहारच नकोसा झाला. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांनी आणि उलथापालथींनी हे नकोसेपण अधिकच टोकदार केले. आम्हीच आमच्या भाषेला चढाओढीने निरुपयोगी ठरवायला लागलो. तिच्या मृत्यूची भाकिते वृत्तपत्रांमधून, चर्चासत्रांमधून वारंवार वाचायला-ऐकायला मिळू लागली. मराठी कोमेजत चालली, मरगळून गेली. आम्ही म्हणालो, 'नाही तरी भाषेला अंत असतोच ना!' म्हणजे तसा तिचा अभिमान वगैरे आम्हाला अजूनही आहेच, त्याची काही अडचण नाही पण त्यासाठी भाषा जिवंत असायला हवी ही कसली चमत्कारिक अट? बरेच झाले, 'मेली तर मेली, कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मेली!’ तिला जगवण्याचा उद्योग करून कुणाला काय मिळणार? मग तिला तशीच सोडून आम्ही दुसऱ्या एका उपयुक्त भाषेचा पदर धरला. अर्थात त्याही भाषेवर प्रेम करायला आम्हाला नाहीच शिकवले गेले." आपल्या समाजाच्या भाषेविषयीच्या मानसिकतेबद्दल सांगताहेत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ माधुरी पुरंदरे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
भाषेला निरुपयोगी ठरविण्यासाठी आमची चढाओढ!
मराठी प्रथम
माधुरी पुरंदरे
2019-11-07 10:00:07

वाचण्यासारखे अजून काही ...

नेपोलियन आणि त्याचे नशीब - उत्तरार्ध
वसंत शांताराम देसाई | 3 दिवसांपूर्वी
"जगांत मोठेपणाची किंमत नाहीं ” म्हणून नेपोलियनचा अंतरात्मा तळमळला.
नेपोलियन आणि त्याचे नशीब - पूर्वार्ध
वसंत शांताराम देसाई | 6 दिवसांपूर्वी
वॉटर्लूच्या पराजयामुळे त्यापूर्वीच्या माझ्या सर्व विजयाची स्मृति नाहींशी होईल.
संपादकीय निवेदन
स. बा. हुदलीकर | 2 आठवड्या पूर्वी
हिंदुस्थानाची प्रगति ही बालकांच्या अप्रतिम शिक्षणावर अवलंबून आहे हे निर्विवाद आहे.
हैदराबादची वारी
अज्ञात | 2 आठवड्या पूर्वी
आकाशवाणी ही स्वायत्त संस्था असावी हा ठराव अत्रे-पु.लं. नी गाजविला.
Meenalogale
6 वर्षांपूर्वीमर्मभेदक पण वास्तव लेख.
Nishikant
6 वर्षांपूर्वीचला आपल्या मुलांना,नातवंडांना मराठीची गोडी लाऊ या!