एक प्रकल्प कविता रसग्रहणाचा!


कवितेद्वारा विद्यार्थ्यांना भाषेची, शब्दांची गोडी लागावी असं एका शिक्षिकेला नुसतं वाटतच नाही, तर त्यासाठी त्या मुलांना पाठ्यपुस्तकाबाहेरील कवितांपर्यंत घेऊन जातात, निवडलेल्या कवीची शाळेतील आणि शाळेबाहेरूनही सर्व पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या कविता निवडीपासून ते त्याच्या रसग्रहणाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होतात. कविता रसग्रहणाच्या  या प्रकल्पाबद्दल सविस्तर सांगतायत पुणे येथील अक्षरनंदन शाळेतील शिक्षिका जयश्री काटीकर - 

---------------------------------------------------------------------

रसग्रहण म्हणजे कवितेचा सारांश सांगणे नव्हे. कवितेची शब्दकाळा, शैली यांची माहीतगार चिकित्सा करणे. लेखकाचे जास्तीत जास्त साहित्य वाचणे. कवितेला त्या संपूर्ण साहित्याच्या संदर्भात बघणे. लेखकाची वौशिष्ट्ये समजून घेणे. निवडलेली कविता, कवीच्या जीवनदृष्टीशी ताडून बघणे. शक्य असेल तर समकालीन लेखंकाशी तुलना कारणे. कवितेचा भावार्थ समकालीन विषयांशी जोडून पाहणे. हे सगळं करण्यासाठी एक शिस्त लागते. शिक्षकांनीही हे लक्षात ठेवणे गरजेचं असतं. त्यामुळे नववी, दहावीच्या टप्प्यावर रसग्रहण ही घटना राहत नाही तर प्रकल्प बनतो.

रसग्रहण प्रकल्पाला निमित्त ठरली कुसुमाग्रजांची ‘अहि-नकुल’ ही कविता. कुठलीही कविता शिकताना, त्यातले शब्द, त्याचे अर्थ जाणून घेता घेताच विद्यार्थ्याची कवितेची जाण अर्थाच्या पलीकडे जायला हवी; हे मनात पक्कं होतं. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , शिक्षण , भाषा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen