संपादकीय - मराठी राज्याची साठोत्तरी कहाणी


१ मे १९६० रोजी मराठीला तिचे हक्काचे राज्य मिळाल्यानंतर शिक्षण, प्रशासन, विधी व न्यायव्यवहार, उद्योग व वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या क्षेत्रांत तिला प्रधान स्थान मिळावे अशी अपेक्षा होती. पण काही प्रमाणात प्रशासन वगळता सर्व क्षेत्रांत मराठीऐवजी इंग्रजीचे राज्य आले आणि मराठीला दुय्यम स्थानावर समाधान मानावे लागले. आज ही स्थिती प्रकर्षाने जाणवते. इंग्रजीचा द्वेष नको, इंग्रजीला विरोध तर नकोच नको म्हणताना मराठीच्या नशिबी कमालीची उपेक्षा आणि अवहेलना आली. आज ह्या उपेक्षेचे खापर सरकार आणि लोक एकमेकांवर फोडत आहेत. नव्वदीच्या दशकापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते मराठी साहित्यिक मराठीच्या ह्या उपेक्षेबाबत एक तर मौन पाळून होते किंवा ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ’ असे म्हणत आशावादी सूर आळवत होते. त्यातला एक वर्ग तर असा होता की तो मराठीची उपेक्षा होत आहे हेच मान्य करीत नव्हता. महाराष्ट्रात गावोगावी काव्यगायनाचे प्रयोग होतात आणि त्याला लोक गर्दी करतात यातच त्याला मराठी भाषेचा विकास दिसत होता. अशा काळात कवी कुसुमाग्रज आणि वसंत बापट यांनी स्पष्ट शब्दांत मराठीचे वास्तव रेखाटून धोक्याचा इशारा दिला. पण हा इशाराही इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे हवेत विरून गेला. राजवाड्यांनी मराठी भाषा आसन्नमरण असल्याचे सांगितले, कुसुमाग्रजांना ती मंत्रालयासमोर फाटक्या वस्त्रांनिशी भिकेचा कटोरा घेऊन उभी असलेली दिसली तर कविवर्य वसंत बापट यांनी तिला रक्तक्षय झाल्याचे निदान केले. समाज म्हणून आपण त्यापासून काहीही बोध घेतला नाही. आपल्या भाषाजाणिवाच जणू बोथट झाल्या. १९६० साली अस्तित्वात आले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी प्रथम - संपादकीय

प्रतिक्रिया

  1. संजय रत्नपारखी

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूप छान आहे. इंग्रजी प्रभाव हा जरी असला तरी तो केवळ मराठीवर नाही. सर्व प्रादेशिक भाषांवर हा प्रभाव आहेच. इंग्रजीची मदत घेऊन आपली भाषा सक्षम होण्यात मदत घ्यावी. इंग्रजी भाषेतील प्रवाह मराठीत यावेत. यासाठी एखादी योजना यावी असे वाटते.

  2. प्रसाद पाटील

      4 वर्षांपूर्वी

    डोळ्यात अंजन घालणारा लेख ...

  3. विशाल नाव्हेकर

      4 वर्षांपूर्वी

    इंग्रजीवर भरपूर तार्किक आणि मार्मिक भाष्य आहे, पण आपल्या शहराची बोलीभाषा, आपल्या करमणुकीची भाषा ( ज्यात वर्षाला काही हजार कोटी मराठी माणूस खर्च करत असतो) , आपल्या भावभावनांची भाषा, ही हिंदी होत आहे. मराठीचे मुळच हिंदी काढून घेत आहे ह्यावर अजिबात भाष्य नाही. हे वाईट वाटतं.

  4.   4 वर्षांपूर्वी

    सर खुप छान लेख आहे..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen