समृद्धीने आता वयाच्या एकोणिसाव्या वर्षात प्रवेश केलेला आहे. या तिच्या संपूर्ण वाटचालीत ती कधीच कोणत्याही शाळेची पायरी चढलेली नाही. असे असूनही ती मराठी, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून संवाद साधते, वाचते, लिहिते. या व्यतिरिक्त इतर भाषा आत्मसात करण्याचेही तिचे सतत प्रयत्न चालूच असतात. कधीच कोणत्याही शाळेत न गेलेली समृद्धी विविध छंद जोपासते. तिची तीन पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. शाळेची पायरीही न चढता तिला हे कसे शक्य झाले असावे? या लेखातून पौर्णिमा केरकर याचीच गोष्ट सांगतायत -
-----------------------------------------------------------------------------------------
मी आणि माझे पती राजेंद्र, आम्ही दोघेही शिक्षकी पेशात वावरणारे. हजारो विद्यार्थी आमच्या हाताखालून गेले. आपली मुलं मेडिकल आणि इंजिनीअरिंगलाच गेली पाहिजेत असे अनेकांना वाटते, पण आम्हाला असे कधी वाटले नाही. गणिताचा तास चालू असताना मुलांनी चित्र काढलं, खिडकीतून निसर्गाचे विविध विभ्रम नजरेने टिपले, एखाद्याने मनापासून आवडीचे गाणे गुणगुणले, तर हा खूप मोठा प्रमादच आहे, अशीच सर्वसाधारण सगळ्यांची मानसिकता असते. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, त्यासाठी मुलांनी अर्थ समजून न घेताच प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ करायची, बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित प्रश्नांपुरत्याच नोट्स, त्यांचेच पाठांतर, अन् या साऱ्यावरून हुषारीची तुलना. शंभर टक्के निकाल लावणे म्हणजे त्या संस्थेची, शाळेची प्रतिष्ठा. आम्ही दोघे पती - पत्नी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
drkailas
5 वर्षांपूर्वीप्रथम..... समृद्धी ला मुक्तपणे पोषक वातावरण निर्माण केल्याबद्दल तिच्या आई बाबांचे अभिनंदन. हल्ली आखलेल्या शिक्षणाच्या चौकटीत बाल सर्जनशिलता कोमेजुन जातेय.समृध्दीला खुप खुप शुभेच्छा.आणि महाराष्ट्रातील तमाम पालकांनी यातुन बोध घ्यावा हिच अपेक्षा. कैलास इंगळे, औरंगाबाद.९४२१६५६९०७
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीजरूर पाठवा
5 वर्षांपूर्वी
मराठी भाषा संवर्धन, शिक्षण-लोकसंस्कृती आणि पर्यावरण संरक्षण या अनुषंगाने त्यांच्याविषयी लिहितोय. पाठवितो लेख तुम्हाला.
5 वर्षांपूर्वी
Khup Chan ...... shikaych aasel tar kuthun he gheta yet pan te ghenya sathi jady pahije ..... Ya lekhatun aamhala barach kahi shikayla milal
स्वप्निल चोपडे
5 वर्षांपूर्वीव्वा जगण्याची खरीखुरी शाळा मुलांना अनुभवू दिली की मुलांचे जगणे समृद्ध होऊन जाते, त्यांना काय आवडते काय नाही याचे आकलन होते परिपुर्ण असे शैक्षणिक वातावरण घरीच तयार करून दिले की चार भिंतीच्या शाळेची गरज पडत नाही. समृद्धीच्या जीवनाचा प्रवास एकदम ग्रेटच आहे.
5 वर्षांपूर्वी
व्वा जगण्याची खरीखुरी शाळा मुलांना अनुभवू दिली की मुलांचे जगणे समृद्ध होऊन जाते, त्यांना काय आवडते काय नाही याचे आकलन होते परिपुर्ण असे शैक्षणिक वातावरण घरीच तयार करून दिले की चार भिंतीच्या शाळेची गरज पडत नाही. समृद्धीच्या जीवनाचा प्रवास एकदम ग्रेटच आहे.
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीचेतन, तुझ्या प्रतिक्रियेतून केरकर दापंत्याविषयीची मलाही बरीच नवी माहिती मिळाली. धन्यवाद!
चेतन
5 वर्षांपूर्वीसाधना, समृध्दी तर ग्रेट आहेच. अर्धा दिवस शाळेत गेलेली समृध्दी विविध क्षेत्रात समृध्द आहे. रविंद्र केरकर सर, पौर्णिमा मॅडम हे दांपत्यही जगावेगळं आहे. गेल्या कांही वर्षांचा यांचा सहवास बऱ्याच गोष्टी शिकवून गेला. त्यांच्या घरी कित्येक गरजू मुलांना आसरा मिळाला. त्यांच्या संगोपनात त्यांनी कधीच कसूर केली नाही. नवख्या माणसाला त्यांच्यातले ॠणाणुबंध बघून प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. माणसाना जिव लावणाऱ्या या कुटूंबाचे निसर्गाशी असलेले बंध कुतूहल जागविणारे आहेत. केरकर सरांनी तर गोव्याची जंगल संपदा वाचविण्यासाठी शासन-प्रशासनाशीही दोन हात केले. माफीयांना अंगावर घेतले. लोकसंस्कृतीच्या जोपासणेबाबत पौर्णिमा मॅडम आग्रही असतात. अलिकडडेच त्यांचे विस्मृतीच्या वाटेवर हे पुस्तक प्रकाशीत झाले. त केवळ पुस्तक नाही लोकसंस्कृतीचे राहाटगाडगे अधोरेखीत करणारा दस्तऐवज आहे. एक विलक्षण कुटूंब. समृध्दीने शाळेत न जाता जी किमया साधली आहे ती इतरांनाही प्रोत्साहीत करणारी आहे. चार भिंतीत होणारा कोंडमारा झुगारून मुलांना स्वछंदपणे बागडू द्यायला हवे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात पालकांची भूमिका महत्वाची ठरते. शिक्षण पोटार्थी असून चालणार नाही, तर जिवन समृध्द करणारे असायला हवे, हाच धडा यातून घेता येईल.
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीमादार सर, या लेखाच्या लेखिका पौर्णिमा केरकर यांनी आपल्या प्रश्नाला खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे. शिवाय आपण त्यांना संपर्कही करू शकता असे त्यांनी कळवले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक लेखाच्या खाली देण्यात आला आहे. - "समृद्धीला शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला ,तेव्हाच ही गोष्ट आमच्या लक्षात आली होती.आम्ही मी आणि माझा नवरा शिक्षकी पेशात वावरणारे.त्यामुळे या कायद्याविषयीची आम्ही सज्ञानी होतोच.आमच्या मुलीच्या बाबतीत असा चाकोरीबाहेरचा निर्णय घेताना तर ती दक्षता आम्ही घेतली होतीच.प्रश्न होता तो आनंददायी शिक्षण प्रक्रियेचा.नेमून दिलेला अभ्यासक्रम, त्यावर आधारित प्रश्नपत्रिका, गुणवत्तेचे निकष, मुलाकडून अपेक्षा, टक्केवारी च्या माध्यमातून मोजली जाणारी हुशारी ..हे कुठेतरी सारखं खटकत होत.मुलीचा सर्वांगीण विकास, कुतूहल, जिज्ञासा, दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या क्षमता ,कौशल्य विकसित करण्यावर भर दिला.याप्रसंगी 'शिक्षण'प्रक्रियेला धक्का दिला नाही.गोव्यातील शिक्षण तज्ज्ञांनी याची दखल घेतली. शिक्षणमंत्र्यांना याची जाणिव आहे.सुरुवातीला पहिली ते चौथी पर्यंतची अभ्यास क्रमाची सर्व पुस्तके तिला घरीच आणून दिली.पुस्तकात जे काही नमूद केलेले आहे त्यातील बऱ्याच गोष्टी तिला आम्ही प्रत्यक्षात दाखविल्या आहेत.स्वतंत्र निर्णय क्षमता, विचारशक्तीचा विकास, संस्कार, स्वावलंबन ,भाषा शिक्षण, लेखन वाचन ,आवडीनिवडी चे जतन ,अनुभवातून जीवनशिक्षण..याला महत्त्व देऊन पुढे गेलो.तिचं नाव तेवढं शाळेत रजिस्टर केलं नाही,पण तिच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकाराच्या आड मात्र आलो नाही.याची जाणीव गोव्यात सर्व स्तरावरून घेण्यात आली हे निश्चितच!" - पौर्णिमा केरकर
Vrushali Jitendra Mohite
5 वर्षांपूर्वीअतिशय वेगळ्या पद्धतीने सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल आहे.
5 वर्षांपूर्वी
समृद्धीला समृद्ध करणार्या पालकांचे अभिनंदन!अनुभव शाळेचे महत्त्व आमच्या पर्यंत पोहचवणार्या प्रथम व साधनाताईस शुभेच्छा!!
अमिता
5 वर्षांपूर्वीबरंच काही शिकवून जाणारा लेख आहे .
श्रीकृष्ण केळकर
5 वर्षांपूर्वीराजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक कर्तृत्ववान महिला कुठे बीए एमए झाल्या होत्या...सुसंस्कारित व्हायला घर हेच मंदिर असताना ...समृध्दीचा समृध्दीपणा समृध्द होत गेला ....
Sanjay Nichite
5 वर्षांपूर्वीसमृद्धीला शुभेच्छा..!
गोविंद
5 वर्षांपूर्वीसमृद्धी ही केवळ नावानंच नाही तर जीवनाच्या अनेक पातळ्यांवरील समृद्ध अनुभवाची ठेव आहे.
mprakash
5 वर्षांपूर्वीखूप सुंदर लेख आणि समृद्धीला घडवण्यामागाचा प्रयास.🎉👍🙏🎊 तरी देखील माझा एक प्रश्न असा आहे की RTE प्रमाणे किमान शाळेत तरी नाव असायला हवे? किंवा गावातील शिक्षकाला माहिती नाही? की समृद्धीच्या पालकांनी मुद्दाम शाळेत नाव नोंदविले नाहीत? आणि जर अस केलं असेल तर ते पूर्णपणे कायद्याचे उल्लंघन आहे, कृपया प्रतिक्रिया कळवा......🙏
5 वर्षांपूर्वी
ग्रेट, कमाल आहे.