संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


यंदाचं वर्ष महाराष्ट्र राज्याचं हीरक महोत्सवी वर्ष आहे, शिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, लावणी, पोवाडा, पटकथा यासारख्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीइतकंच लक्षवेधी आहे. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून लोकांना भाषिक अन्यायाविरुद्ध कसं पेटून उठवलं, हा लढा लोकभाषेतून लोकांपर्यंत कसा पोहचविला याचा लेखाजोखा मांडणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख –

--------------------------------------------------

स्वतंत्र भारताच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताची सांस्कृतिक व भाषिक विविधता लक्षात घेऊन भारताची भाषावार प्रांतरचना करावी ही कल्पना भारतातील विचारवंत व राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारली होती. त्यामुळेच महात्मा गांधीनी १९२० साली नागपूरच्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात भाषावार प्रांतरचनेचा ठराव मंजूर करून घेतला, तर १९३८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचे वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे, अशा आशयाचा ठराव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मंजूर करून घेतला. १९४६ साली बेळगावच्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही ग. त्र्यं. माडखोलकरांचा याच मागणीचा ठराव मंजूर झाला. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद या सर्व पक्षीय संघटनेची स्थापना करण्यात आली. याच मागणीच्या विचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी अभ्यास केंद्र , मराठी प्रथम , संयुक्त महाराष्ट्र चळवळ , लोकशाहीर , अण्णाभाऊ साठे , प्रतीक्षा रणदिवे

प्रतिक्रिया

  1. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख फार आवडला।

  2. Manali1978

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय अभ्यासपूर्ण लेख.

  3. rsanjay96

      4 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen