भाषाविचार - भाषा आणि वादचर्चा-स्पर्धा (भाग - ७)


"महाराष्ट्रात काय किंवा देशाच्या इतर भागांमध्ये काय अशा शेकडो स्पर्धा होत असतील. त्यातून तरुण मुलांचं वैचारिक आदानप्रदान घडत असेल. नव्या पिढीचं भाषाभान समृद्ध करण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण गेल्या दहावीस वर्षांत अशा स्पर्धांना जाणारी मुलं घटलीत. त्यांना इतर गोष्टी खुणावू लागल्यात. आपल्या तिजोरीला धक्का लावण्यापेक्षा महाविद्यालयं, संस्था आता प्रायोजक घेऊन चटपटीत, गडबडगुंडा, धांगडधिंगा असलेले कार्यक्रम करू लागलेत. त्यामुळे दिलखेच नाचगाण्याच्या कार्यक्रमांनी भरलेल्या फेस्टिव्हल्सनी सगळा माहोल भारलाय. इथे फार विचार नकोच आहे कुणाला. भाषाबिषांची भानगडच नको. सूत्रसंचालनापासून जाहिरातींपर्यंत सगळं इंग्रजीमय झालंय. त्यामुळे अशा स्पर्धा सांदीकोपऱ्यात घेण्याची वेळ लोकांवर आलीय. भाषेच्या दृश्य व्यवहारातलं एक परिणामकारक क्षेत्र आटतंय. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आधीच आपापल्या भाषांपासून दुरावली आहेत, त्यात ह्या इव्हेंटीकरणामुळे भरच पडलीय. हा दुष्काळ पावसाअभावी होणाऱ्या दुष्काळाइतकाच भयानक आहे. त्यातून बाहेर पडायचं तर अशा स्पर्धा गावोगावी व्हायला हव्यात. भाषा जगवण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे."  ‘भाषाविचार’ सदरातून तरुणांच्या भाषेविषयी सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

-------------------------------------------------------------------

मागे एका वादविवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून पुण्याला गेलो होतो. ‘प्रमाणित मराठीचा आ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , मराठी अभ्यास केंद्र , भाषाविचार , मराठी प्रथम , दीपक पवार , भाषाभान

प्रतिक्रिया

  1. rsanjay96

      4 वर्षांपूर्वी

    डॉ. दिपक पवार यांनी भाषा व्यवहारातील काही उत्तम निरीक्षणे नोंदवली आहेत. एकूणच भाषा शिक्षण आणि प्रमाणित भाषा हा समाजात, उद्योग क्षेत्रात महत्त्वाचा विषय राहिला नाही. भाषा न येताही व्यवहार जमावा,हे आता शिक्षणात सूत्र झाले आहे. अगदी काँनव्हेंट विद्यार्थी ही आज प्रमाणित इंग्रजी बोलत वा मांडत नाही.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen