विसर्जन


या वेळी पंडितजी आणि इतर मंडळी महात्माजींची रक्षा कलशामध्ये घेऊन संगमावर असलेल्या खास तराफ्यांकडे निघाली होती. एवढा जनसमुदाय--सारा शांत होता. मी आणि भानुभाई घोडेस्वारांच्या दोन पलटणींमध्ये उभे राहून सारं दृश्य सामावून घेत होतो. संगमाच्या दुसऱ्या तीरावरही काठापासून तो पाण्याच्या धारेपर्यंत इंच इंच जागा माणसांनी व्यापली होती.

आमच्या दहाबारा जणांच्या गर्दीत दोनतीन स्त्रिया होत्या. त्यातल्या एकीला सारा शीण, सारा ताण, ऊन, हवा, काहीतरी म्हणा-सहन झालं नाही आणि ती बघता बघता बेशुद्ध झाली. सुदैवानं माझ्याजवळ पाण्याची बॅग होती. घोडेस्वार लष्करी शिस्तीचे. त्यांनी सारं बघितलं, पण फुरफुर करणाऱ्या आणि खुरांनी माती उकरणाऱ्या घोड्यांना आवरण्याखेरीज ते काही करत नव्हते. आम्ही पाणी दिलं आणि ती बाई चारपाच मिनिटांनी शुद्धीवर आली. तिचं पहिलं वाक्य : रक्षाविसर्जन केलं का ?

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    छान वर्णन



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen